• Mon. Sep 7th, 2026

न भूतो न भविष्यती, दिल्लीही दखल घेईल असा मोर्चा निघावा; राज ठाकरेंचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश

ByMH LIVE NEWS

Oct 26, 2025
न भूतो न भविष्यती, दिल्लीही दखल घेईल असा मोर्चा निघावा; राज ठाकरेंचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आदेश
मुंबई-प्रतिनिधी 
 मतदार यादीतील घोळाविरोधात निवडणूक आयोगविरोधात १ नोव्हेंबरला काढण्यात येणारा मोर्चा ‘न भूतो न भविष्यती’ असा झाला पाहिजे. या मोर्चाची दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे, त्या दृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले.शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, डावे पक्ष यांच्याकडून एकत्रितपणे महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी राज ठाकरे यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक बोलावली होती.

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले की, ‘हा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे. हा मोर्चा खोट्या मतदारांसाठी नाही तर खऱ्या मतदारांसाठी आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मोर्चाची दखल घ्यायला लागली पाहिजे’. विरोधकांतर्फे अलीकडेच निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली होती. त्यावेळी मतदार याद्या पूर्णपणे नव्याने अद्ययावत होणार नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती.

लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर भाजप समाजात विष कालवण्याचे काम करत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणातही भाजप द्वेषाचे विष कालवत आहे. अशा विषारी प्रचाराला बळू पडू नका, फसोगे तो लुटोगे’, असे आवाहन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केले आहे. मुंबईत दिवाळीनिमित्त वाटण्यात आलेल्या मिठाईच्या पुड्यांवर बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं, अशा प्रकारचा मजकूर छापण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यानुषंगाने गायकवाड बोलत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed