Jalgaon Accident News: जळगावात एका भीषण अपघातात दोघांचा जीव गेला आहे. कामावरुन घरी जात असताना या दोघांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
हे दोघे चोपडा शहरातील कामे आटोपून मामलदे येथे दुचाकीने जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना कट मारला. कट मारल्याने दुचाकी अनियंत्रित झाली आणि अपघात झाला. या गंभीर अपघातात अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय – 25) आणि पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय – 23) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना चोपडा-मामलदे फाटाच्या दरम्यान 16 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.
Raigad Crime: इंस्टाग्रामवर प्रेम, बॉयफ्रेंड अन् मैत्रिणीच्या मदतीने पतीला संपवलं; 19 वर्षीय पत्नीच्या कारनाम्याने रायगड हादरलं
दरम्यान, अपघाताच्या या घटनेने मामलदे परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच मामलदे, चुंचाळे व चोपडा शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अपघातातील दोघा तरुणांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तपासणी अंती डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. यावेळी शहरातील व मामलदे आदी गावातील शेकडो नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन गर्दी केली होती.
सध्या दिवाळीची सर्व ठिकाणी धामधूम सुरू असून देवडीच्या खरेदीसाठी दोघं तरुण चोपडा शहरात आले होते त्यांची सर्व दिवसभराची कामे आटवून ते सायंकाळी घराकडे निघाले होते घरच्यांचे देखील दोघांची अतुटणे येण्यासाठी वाट पाहत होते. मात्र, दिवाळी सारख्या सणापूरवी दोघांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

