Raigad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रायगडमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. भीशीच्या नावाखाली आणि व्याजदर स्कीमच्या नावाखाली महिलांना फसवल्याचं समोर आलं आहे. या प्रकारानं रायगडमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील संशयित महिला पोस्टडेटेड चेक देऊन वेळकाढूपणा करत होती, मात्र बँकेत खाते शिल्लक नसल्याने चेकही बाऊन्स झाले. अखेर फसवणूक झालेल्या सुमारे 40 खातेदारांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फसवणूक झालेल्या महिलांनी पैसे मागितले असता, संबंधित महिलेने कबूल केलं की, ‘माझ्याकडे 100 लोकांचे 1.5 कोटी रुपये देणं आहे. मी डायरीत नोंद केली आहे. घर विकून परत करेन’, मात्र घर विकण्यास ती तयार नाही. उलट ती महागडी इमारत उभारून तिथे राहते आणि परदेश दौरे करते, अशी माहिती तक्रारदारांनी दिली.
Raigad News: करणीच्या संशयातून अख्खं कुटुंब टाकलं वाळीत, बहिष्काराचे नियम पाहून बसेल धक्का; ३३ जणांवर गुन्हा दाखल
तक्रारीनुसार, संबंधित महिलेनं महिन्याला 5% व्याज दराचं आमिष दाखवून अनेक महिलांकडून पैसे उकळले. अनेकांना रोखीने पैसे दिले गेले, तर काहींना चेक देण्यात आले आणि तेही बाऊन्स झाले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ही रक्कम केवळ सुरुवात आहे. तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून, ही फसवणूक 3 कोटींच्यावर पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येतो. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे. तक्रारी वाढल्यास, या महिलेविरोधात गुन्हा दाखल करून अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. तपासात तिच्या मालमत्तेची चौकशी, आर्थिक व्यवहार आणि इतर गुंतवणुकींचा मागोवा घेण्यात येणार आहे.
Beed Crime : ‘अनेक वेळा सांगून या ठिकाणी का राहता?’; घरात घुसून डोक्यावर, पाठीत अन् पायांवर वार, सतीश भोसलेच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला
साध्या कर्मचारी पतीचं ऐश्वर्य
महिलेचा पती हा साधा ग्रामपंचायत कर्मचारी असूनही, कुटुंब दरवर्षी परदेश दौऱ्यांवर जात असल्याची माहिती आहे. तसेच मोहापाडा येथे स्वतःची इमारत उभी करून त्यात वास्तव्य करत आहे. एवढ्या संपत्तीचा स्रोत काय? हा प्रश्न आता तपासयंत्रणांना भेडसावत आहे. एका तक्रारदाराने पुरावा म्हणून सादर केलेला 50 हजारांच्या नोटा घेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे या प्रकरणाने आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे.

