Mumbai-Dharavi Flyover: मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वांद्रे-धारावी उड्डाणपुलाचा पहिला टप्पा 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. मिठी नदीवरून जाणाऱ्या या 10 पदरी पुलाचे काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी 204 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या पूलामुळे वांद्रे आणि धारावीदरम्यानची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत पुलाचा पश्चिमेकडील भाग वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी सुरू आहे.
मेट्रो टॉवरचा आम्हाला त्रास होतोय, खिडक्या, दारही उघडू शकत नाही, चर्चगेटच्या रहिवाशांची तक्रार
मिठी नदीवर उभारला जाणार
मिठी नदीच्या विस्तारीकरणाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, वांद्रे आणि धारावी यांना जोडणाऱ्या या पुलाची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. हा पूल जिओ वर्ल्ड ड्राइव्ह रोड जंक्शनजवळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुरू होतो आणि धारावीच्या दिशेने पसरतो. सध्याचा पूल मीठी नदीपासून सुमारे 110 मीटर दक्षिणेकडे आहे.
या पुलाची पुनर्बांधणी दोन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिमेकडील भागाचे काम, तर दुसऱ्या टप्प्यात पूर्वेकडील भागासह जुन्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम करण्यात येईल.
10 पदरी रचना आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रथम दोन नवीन रचना उभारल्या जातील. त्यानंतर सध्याचा पूल पाडून नव्याने बांधण्यात येईल. पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग चक्क 10 पदरी असेल. पुलाची एकूण लांबी 198 मीटर असून, सुपरस्ट्रक्चर कंपोझिट स्टील आणि स्टील गर्डर्सपासून, तर डेक काँक्रीटपासून तयार केला जाणार आहे.
महापालिकेने पहिल्या टप्प्यासाठी पुढील दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी लवकरच कामाचे आदेश जारी होणार असून, त्याचा कालावधी अंदाजे 18 महिने असेल.
CJI गवईंचा अवमान करणाऱ्या वकिलाला निलेश लंकेंनी भेट दिली संविधान प्रत आणि डॉ.आंबेडकर यांची फ्रेम
प्रकल्पाचा खर्च आणि कालावधी
प्रकल्पाचा एकूण खर्च: Rs. 204 कोटी
पहिला टप्पा: Rs. कोटी
दुसरा टप्पा: Rs. 162 कोटी
संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख: डिसेंबर 2027

