Nilesh Ghaywal Case : त्यावेळी जामखेडचे आमदार कोण होते आणि गृहमंत्री कोण होते?’ असा सवाल सिद्धार्थ शिरोळे यांनी केला आहे.
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी तर थेट या प्रकरणात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव घेतलं आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचे घायवळ सोबतचे कनेक्शन असल्याच जाहीरचं सांगितलं होतं. घायवळ याने पासपोर्ट काढताना ‘गायवळ’ नावाचा वापर केल्याची माहिती पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमधून समोर आली होती. ही सगळी माहिती समोर आल्यानंतर आणि भाजप नेते अडचणीत येत असल्याचं लक्षात आल्यानंतर तब्बल आठ ते दहा दिवसानंतर भारतीय जनता पार्टी कडून अधिकृत पत्रकार परिषद घेत निलेश घायवळ याला पासपोर्ट मिळताना कोणा कोणाचा सहभाग होता याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Crime News : समलिंगी संबंधांचा भयावह शेवट, रात्री घरी ‘तो’ येताच अशोकचं डोकं फिरलं, यूट्यूबवर व्हिडिओ पाहून…
भाजपचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेत पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टचा दाखला देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ‘निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला आहे. त्याने पासपोर्ट कसा घेतला त्याबाबत धक्कादायक माहिती देत पासपोर्ट घेतला आहे. तो अहिल्यानगरमधील सोनेगावचा राहिवासी आहे. त्याने ज्यावेळेस पासपोर्ट मिळवला त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्याच्या पोलीस व्हेरिफिकेश रिपोर्टमध्ये एकही गुन्हा दाखल नाही. त्याने जो पत्ता नोंदवाला तो बनावट आहे. हा रिपोर्ट तयार करण्यात आला तो कुणाच्या दबावाखाली करण्यात आला आहे? त्यावेळी जामखेडचे तात्कालीन आमदार कोण होते आणि गृहमंत्री कोण होते?’ असा सवाल सिद्धार्थ शिरोळे यांनी केला आहे.
चंद्रकांतदादांच्या विधानावर मौन सोडलं, गौतमी पाटील स्पष्टच बोलली
18 कुटुंबांना एक कोटी मिळाले, इतरांना एक रुपयाही नाही, एअर इंडिया अपघातग्रस्त पाटील-सोनघरे कुटुंबीय म्हणतात, लेकी गेल्या अन्…
तर, याची सखोल चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करत आहे. या प्रकरणात सगळं खोटं रंगवलं जात आहे. यामध्ये अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. कुठल्या तरी दबावाखाली सुरु असल्याचं देखील शिरोळे म्हणाले आहेत. त्यामुळे भाजप नेते अडचणीत येत असताना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर असताना सकाळीच भाजपने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना प्रश्नांचं ग्राउंड सेफ करून दिलं का? असा सवाल उपस्थित होत आहे. तर भाजपची ही पत्रकार परिषद म्हणजे बैल गेला अन् झोपा केला अशी गत असल्याची देखील टीका केली जात आहे.

