• Wed. Mar 11th, 2026
    Mumbai News: RTO कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा; पात्र कर्मचाऱ्यांची पदोन्नती रखडल्याने नाराजी

    Mumbai News: ​​सरकारने आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा न काढल्यास बेमुदत संप करण्यात येणार आहे, असे सरचिटणीस, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले.

    rto employees(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी नवीन आकृतीबंधास सरकारची मंजुरी मिळाल्यानंतरही दोन वर्षांसाठी प्रक्रिया रखडली आहे. पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळत नसल्याने परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे मोटार वाहन विभागातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी २६ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन आयुक्त कार्यालय परिसरात आरटीओ कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

    परिवहन विभागात ६६ प्रशासकीय अधिकारी पदांवर पदोन्नती रखडली आहे. कार्यालयीन अधीक्षकांकडून सेवा प्रवेश नियमावर बोट ठेवत पदोन्नती नाकारली जात आहे. याचा थेट फटका कर्मचाऱ्यांना बसत असून कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडे संघटनेने वारंवार बैठकीची मागणी केली. मात्र, बैठकीस नकार देण्यात येत आहे. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
    Maharashtra TimesMahavitaran Strike: महावितरण कर्मचारी 3 दिवस संपावर; वीजपुरवठ्यासंंबंधी तक्रारी असल्यास कुठे साधाल संपर्क?
    सरकारने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला दिलेली आश्वासनेही पाळली जात नाहीत. मोटार वाहन कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोटार वाहन कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी परिवहन विभागाच्या मुख्यालय परिसरात बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत.

    Maharashtra Timesलाडक्या बहिणींची दिवाळी गोड! सप्टेंबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, तब्बल ४१० कोटी मंजूर, कधी मिळणार?
    असे मिळाले होते आश्वासन
    राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत परिवहन आयुक्त यांनी कर्मचारी पदोन्नतीबाबत धोरण स्पष्ट केले होते. यात सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत ज्या कर्मचाऱ्यांना ५० वर्ष पुर्ण झालेली आहे. अशांना परीक्षा नियम लागू करण्यात येणार नाही.
    परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश लगेच काढण्यात येतील. सदर निर्णय लागू केल्यानंतर उर्वरित पदोन्नती पात्र कर्मचाऱ्यांना तीन -तीन महिन्यांचे तदर्थ पदोन्नती आदेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा