• Mon. Mar 9th, 2026

    Cyclone Shakti Alert: सावधान! किनारी गावांना ‘शक्ती’चा धोका; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सरकारच्या सूचना

    Cyclone Shakti Alert: सावधान! किनारी गावांना ‘शक्ती’चा धोका; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सरकारच्या सूचना

    Cyclone Shakti Alert: हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळाने सहा तासांत सुमारे आठ किलोमीटर प्रतितास वेगाने वायव्य दिशेने हालचाल केली आहे.

    Shakti Cyclone in Arabian Sea.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत ते, तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

    भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या प्रादेशिक केंद्र, कुलाबा वेधशाळेने यासंदर्भातील अंदाज वर्तविल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील मच्छिमारांना हे आवाहन केले आहे.
    Maharashtra Timesमहामोर्चावर ‘ओबीसी’ ठाम! मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत समाधान न झाल्याने संघटनांची भूमिका
    ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता हे चक्रीवादळ २२.० अंश उत्तर अक्षांश आणि ६६.४ अंश पूर्व रेखांशाजवळ केंद्रित होत असल्याचे अधोरेखित केले आहे. तर ४ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ते तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते ५ ऑक्टोबरपर्यंत पश्चिम-नैऋत्येकडे सरकून उत्तर आणि मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागात पोहोचेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
    Maharashtra TimesDevendra Fadnavis: २०२६ हे ‘भरती’वर्ष! मोठ्या प्रमाणात पदभरती करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
    वादळी वारे आणि उंच लाटा
    पुढील काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचना भारतीय हवामान विभागाने सर्व मच्छिमार, मच्छिमार सहकारी संस्था आणि नौकामालकांना दिल्या आहेत. वादळी वारे आणि उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने समुद्र अत्यंत खवळलेला राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या सूचनेची माहिती सर्व मच्छिमार आणि किनारी गावांतील नागरिकांपर्यंत त्वरीत पोहोचवावी, असे निर्देश राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने सर्व किनारी जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. सागरी सुरक्षितता आणि जीवितहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा