काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत सरकारवरही टीका केलीये. ते म्हणाले, ओबीसी बैठकी संदर्भात मुख्यमंत्री यांनी निमंत्रण दिले आहे.10 ऑक्टोबरला आम्ही मोर्चा काढणार असल्यानं चर्चा करण्यासाठी निरोप आलाय.मुख्यमंत्र्याकडे आमची 2 सप्टेंबर चा जीआर रद्द करावे हीच मागणी असणार आहे. हीच मागणी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी संघटनांची आहे.2 सप्टेंबर चा जीआर हा ओबीसींच्या वाटेकरी करणारा आणि उद्धवस्त करणारा…अशी भावना ओबीसी समाजात आहे. जीआर रद्द करावा अशी मागणी आहे.