Maharashtra Marathi News : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक गावात बाहेरील व्यक्तींनी जमिनी घेऊन गुंतवणूक केली. त्यामुळे परराज्यातील किंवा बाहेर जिल्ह्यातील व्यक्ती आता ग्रामीण भागात फार्म हाऊस बांधून तिथे पर्यटनासाठी जातात मात्र यामुळे कुठेतरी पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, यास पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एका गावाने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
गावातील जमीन गावाबाहेरील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तींना विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. चिपळुणातील मोरवणे ग्रामपंचायतीच्या ऐतिहासिक ठराव करण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठराव एकमुखाने मंजूर केला. या ठरावानुसार गावातील जमीन गावाबाहेरील अथवा परजिल्ह्यातील व्यक्तींना विकता येणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कुटुंबाला खरी गरज भासल्यास ती जमीन फक्त गावातील नागरिकांनाच विकावी लागेल अशा स्वरूपाच्या या ठरावात अटींचा उल्लेख आहे.
Ratnagiri Crime : गर्लफ्रेंडला संपवून दरीत टाकलं, नंतर आणखी दोघांचा जीव घेतला; मुलाचं दुष्कृत्य लपवण्याचं बापाचं कारस्थान अन्…
गेल्या काही वर्षांत कोकणातील निसर्गरम्य गावे परगावीय व परप्रांतीय लोकांचे आकर्षण ठरली आहेत. हवामान, निसर्गरम्यता आणि परवडणाऱ्या दरात जमीन मिळत असल्याने बाहेरच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर कोकणात जमिनी खरेदी केल्या. या जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातूनही काही दलालांनीही गब्बर पैसा मिळवला आहे. मात्र या जमीनींच्या खरेदीमुळे स्थानिकांच्या भविष्यातील पिढ्यांसाठी जमीन उरणार नाही, अशी भीती सातत्याने व्यक्त केली जात होती.
कोकणात राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनाही बसणार मोठा धक्का? युवा नेता महायुतीच्या वाटेवर, गुप्त बैठकांचा सपाटा
चिपळूण तालुक्यातील मोरवणे ग्रामसभेच्या निर्णयामुळे मात्र या अनियंत्रित व्यवहारांना आळा बसणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. ग्रामसभेत झालेल्या चर्चेत गावकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली की जमिनी गावकऱ्यांच्या हक्कासाठी राखीव ठेवायला हव्यात अशी येथील ग्रामस्थांची भूमिका आहे.बाहेरचे लोक पैशाच्या जोरावर जमीन घेतात आणि गावाचा सामाजिक समतोल बिघडतो. स्थानिक तरुणांना शेतीसाठी किंवा घरे बांधण्यासाठी जागा उरत नाही. त्यामुळे हा ठराव अत्यावश्यक असल्याचे मत एकमुखाने मांडण्यात आले. अखेरीस सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला. हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नसला तरी तो गावासाठी सामाजिक बंधन ठरणार आहे. ग्रामस्थांनी ठरावाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली असून कोणीही बाहेरच्या व्यक्तीस जमीन विकण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामसभा त्याविरोधात उभी राहील, अशी स्पष्ट भूमिका घेण्यात आली आहे.
Ratnagiri News : मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी… रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
मोरवणे ग्रामसभेचा हा ठराव केवळ एक निर्णय नाही तर गावाच्या एकात्मतेचा संदेश देणारा ठरला आहे. गावकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवत भविष्यातील पिढ्यांना शेती व घरजमिनींची कमतरता भासू नये, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. परिणामी “गावची जमीन गावातच” ही संकल्पना राबवून गावाने हा एकमुखी निर्णय घेतला आहे. कोकणातील गावांनी स्थानिकांनी जमिनी विकू नका. निसर्ग संपदा जपा येथील जलस्त्रोत जपा शेकडो वर्ष जुनी असलेली झाडे वृक्षसंपदा जपा येथील डोंगरांचे रक्षण करा जमिनी विकू नका असाच संदेश या ठरावातून देण्यात आला आहे.

