• Thu. Jun 11th, 2026

    गणेशोत्सवातील सुट्टी भोवली! गैरहजर कर्मचाऱ्यांना पालिकेचा दणका; 650 कामगारांचा 1 दिवसाचा पगार कापला

    गणेशोत्सवातील सुट्टी भोवली! गैरहजर कर्मचाऱ्यांना पालिकेचा दणका; 650 कामगारांचा 1 दिवसाचा पगार कापला

    Mira-Bhayander Municipality: गणेशोत्सवात नियमबाह्य सुट्टी घेतल्याने मिरा- भाईंदर महापालिकेने मोठी कारवाई केली. यामध्ये ६५० कामगारांचा एक दिवसाचा पगार कापला.

    salary cut(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महापालिकेच्या तब्बल ६५० स्थायी कर्मचाऱ्यांवर एक दिवसाच्या वेतन कपातीची कठोर कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पूर्वसूचना न देता बेजबाबदार पद्धतीने गैरहजर राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून, महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही पार पडली आहे.

    गणेशोत्सवाच्या दिवसांत विसर्जन व्यवस्था उभारणे, त्याचे नियोजन करणे आणि इतर अनेक कामांमुळे प्रशासनावर मोठा ताण येतो. हे लक्षात घेऊन, गणेशोत्सव काळात कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने पूर्व परवानगीशिवाय कार्यालय सोडू नये किंवा सट्टी घेऊ नये, असा आदेश महापालिकेने परिपत्रकाद्वारे जारी केला होता. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून २९ ऑगस्ट रोजी मिरा-भाईंदर पालिका मुख्यालयासह विविध कार्यालयांतील सुमारे ६५० पेक्षा अधिक कर्मचारी कामावर गैरहजर होते.
    Maharashtra TimesMumbai Ganesh Visarjan 2025: ‘लालबागचा राजा’ची शान परंपरेसोबत तंत्रज्ञानाने वाढणार, विसर्जन मिरवणुकीत खास यंत्रणा
    विशेष म्हणजे, या गैरहजर कर्मचाऱ्यांमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश होता. याची गंभीर दखल घेऊन आयुक्त शर्मा यांनी या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या निर्देशांनुसार, गैरहजर कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी अंमलात आणली. या कारवाईमुळे सुमारे १६ लाख रुपयांच्या वेतन कपातीची रक्कम आकारण्यात आली आहे.
    Maharashtra TimesMumbai Ganesh Visarjan: गणेश विसर्जनासाठी मुंबई लोकल सज्ज; ५० अधिकारी, ४५० कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त
    मिरा-भाईंदर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर
    आगामी मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी रात्री पालिकेकडून हा आराखडा जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे, हा प्रभाग आराखडा आणि नगरसेवकांची संख्या २०१७मध्ये झालेल्या निवडणुकांप्रमाणेच ‘जैसे थे’ आहे. यावर हरकती नोंदवण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

    आरक्षणही ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता
    २०१७ च्या निवडणुकांमध्ये अनुसूचित जातीसाठी ४ आणि अनुसूचित जमातीसाठी १ जागा आरक्षित करण्यात आली होती. त्या वेळीची लोकसंख्या लक्षात घेऊन हे आरक्षण ठरवले गेले होते. यंदाही हाच आकडा ग्राह्य धरला जाणार असल्याने अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित जागांची संख्या तशीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा