• Sun. Mar 8th, 2026
    Eknath Shinde : मागण्या मान्य, जरांगेंच्या डोळ्यात पाण्याचे टिपूस; मुख्यमंत्र्यांनतर DCM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

    Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस उपोषण केलं. सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या आंदोलनार तसेच आरक्षणावर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई : ‘ मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस उपोषण केले. सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. आम्ही सुरुवातीपासून सकारात्मक होतो. कायदा टिकला पाहिजे याबाबत आम्ही विचार केल्याचं’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ‘मराठा समाजावर अन्याय होऊ नये, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका’, असल्याचं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

    ‘मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची समिती केली होती. त्या कमिटीतीली सगळ्यांचे अभिनंदन करतो’, असं शिंदे म्हणाले. ‘चर्चा करुन मोठा निर्णय घेतला आहे. सातारा गॅझियट आणि हैदराबाद गॅझियटबाबत मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या’, असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. ‘पूर्ण प्रमाणपत्र मिळणे अधिक सुलभ होणे अशी मागणी होती. तीन सदस्यांची समिती गठीत केली असून तत्काळ कार्यवाही करण्यात येणार’, असं शिंदे म्हणाले.

    ‘शब्दात फेरफार, सरकारनं फसवलंय, मला माफ करा…’, जीआरसंबंधी वकिलाचा धक्कादायक खुलासा

    याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला दोष दिला, शिव्या दिल्या तरीही मी कालही समाजासाठी काम करत होतो, आजही करतोय आणि उद्याही करत राहीन. मराठा समाज असो, ओबीसी समाज असो किंवा महाराष्ट्रातील कुठलाही समाज असो, प्रत्येक समाजासाठी काम करणं हे मी माझ्या कर्तव्य समजतो. ते कर्तव्य करत असताना कधी तुम्हाला कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हार मिळतात’, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

    Maharashtra Times‘ओबीसी समाजानेही सर्व आंदोलनं मागे घ्यावीत’, जरांगेंनी उपोषण सोडताच मुख्यमंत्र्यांचं आवाहन

    ‘मी एक सांगतो की, राजकारणात सातत्याने टीकाही सहन करावी लागते आणि लोकं तुमचं स्वागतही करतात. जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही. माझ्यासमोर एकच ध्येय होतं की, मला समाजाला न्याय द्यायचा आहे. तो न्याय देत असताना दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत, दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, दोन समाजात ह्याला दिलं तर आपलं आरक्षण कमी झालं अशी अन्याय झाल्याची भावना निर्माण होणार नाही, अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल. म्हणून या संदर्भात जे कायदेशीर विषय होते त्याचा अभ्यास करुन हा निर्णय घेतला आहे. ह्याचं श्रेय तुम्ही आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं पाहिजे. ही समिती पुढेही सातत्याने समाजासाठी काम करेल’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed