Marathwada Rain Update: मराठवाड्यात सर्वत्र दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच गुरुवारपासून पावसाने जोर पकडला. शुक्रवारच्या सकाळी दहा वाजेच्या अहवालानुसार विभागात ३४.९ मिमी पाऊस पडला.
नांदेडमध्ये ३१ मंडळांत अतिवृष्टी झाली असून पाण्यात वाहून गेल्याने एकाच तर भिंत कोसळून एका दाम्पत्याचा असे एकूण तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, जलसाठ्यात वाढ झाल्याने मांजरा, लोअर तेरणा, इसापुरसह येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे दोन दरवाजेदेखील शनिवारी दुपारी उघडण्यात आले होते. सायंकाळी या धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
Abdul Sattar : शिंदेंचे नेते पुन्हा अडचणीत, छत्रपती संभाजीनगरमधील मोठ्या घोटाळ्यामुळे सत्तार अडकणार?
नांदेडमध्ये तिघांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत मिळून ३१ मंडळांत अतिवृष्टी झाली. मौजे कोटबाजार येथे पावसामुळे राहत्या घराची भिंत कोसळून शेख नासर शेख आमीन (७२) व त्यांची पत्नी शेख हसीना बेगम शेख नासर ( वय ६८) यांचा मृत्यू झाला. सिंदगी ते बोधडी नाल्यावरून वाहत असलेल्या पाण्यातून स्कूलबस घेऊन जाताना बस वाहून गेली. शोध मोहिमेनंतर चालक प्रेमसिंग मोहन पवार ( वय ४२) यांचा मृतदेह आढळल्याचे किनवट तहसीलदारांनी सांगितले.
केदारनाथमध्ये भयंकर दुर्घटना; महाराष्ट्रातील सॉफ्टवेअर इंजिनिअर भाविकाने गमावला जीव
गणोरीत ढगफुटीसदृश पाऊस
फुलंब्री : तालुक्यातील गणोरी परिसरात शुक्रवारी (१५ ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चारदरम्यान ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके आडवी झाली आहेत, तर अनेकांच्या शेतजमिनी वाहून गेल्या.
मांजरा, तेरणा धरणांचे
दरवाजे उघडले
लातूर : गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तावरजा नदीला पाणी आल्यामुळे या तीन नद्यांवरील बॅरेज, मध्यम प्रकल्प आणि दोन मोठ्या धरणांत जलसाठा चांगला झाला आहे.
‘मी त्या बैठकीत नव्हतो’, सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
जळगावात जोरदार पुनरागमन
जळगाव : जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पुनरागमन झाले. जिल्ह्यातील एरंडोल, धरणगाव अवघ्या काही तासांतच झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे परिसरात मालमत्तेसह शेती पिकांचेही नुकसान झाले. जिल्ह्यात रात्रभरात ५० मिमी पावसाची नोंद झाली. तर पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात १०७ मिमी, शेजारील एरंडोल तालुक्यात ११५ मिमी पावसाने संपूर्ण परिसर जलमय झाला. अनेक भागातील शेतीच्या पिकांनादेखील या अतिवृष्टीचा फटका बसला. धरणगाव व पाळधी गावात घरांसह दुकानांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. एरंडोलसह पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव आणि रावेर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली.

