Shiv Sena UBT MNS Manomilan Meeting : निवडणुकीच्या प्रचारात एमडी ड्रग्जसह इतर मुद्दे आपण नीट हाताळले असते, तर आपला विजय झाला असता, असे दिंडे बोलताच पांडे यांचा पारा चढला.
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचे संकेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्यानंतर स्थानिक पातळीवरील नेत्यांनीही आता मनोमिलनाची तयारी सुरू केली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या (उबाठा) संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनोमिलनासाठी शुक्रवार 8 ऑगस्टला एकत्रित बैठक बोलवली होती.
शिवसेनेच्या शालिमार कार्यालयात झालेल्या या बैठकीत पक्षाचे उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, माजी आमदार वसंत गिते, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्वाती पाटील, उपजिल्हा प्रमुख केशव पोरजे, भारती ताजनपुरे सहभागी झाले. तर मनसेकडून प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुजाता डेरे आदी उपस्थित होते.
Uddhav Thackeray : इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिवसेना-भाजपची बोचरी टीका, तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे
संयुक्त मोर्चा काढणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी लागावे, असे सांगत नाशिकच्या प्रश्नांसाठी लवकरच मनसे व शिवसेना (उबाठा) यांचा संयुक्त मोर्चा काढण्यात येईल, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठकीत सांगितले. शहरात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, ड्रग्ज विक्री, खून, खड्डे, कांद्याला भाव नाही, पीक कर्ज या मुद्यांवर संयुक्तपणे मोर्चा काढला जाणार आहे. त्यापूर्वी मनसे व शिवसेनेतर्फे संयुक्त तालुके मेळावे घेत जनजागृती केली जाणार आहे.
Uddhav Thackeray LIVE | उपराष्ट्रपतींचा तडकाफडकी राजीनामा, दिल्लीतून उद्धव ठाकरे लाइव्ह
Vitthal More : उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का, विश्वासू शिलेदाराचा राजीनामा, म्हणाले मनमानी करणारे…
बैठकीत भाषणाच्या शेवटी दिंडे यांनी विधानसभा निवडणुकीचे स्वतःचे अनुमान मांडले. त्यात नाशिक मध्य मतदारसंघातून वसंत गिते यांचा पराभव झाला. या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी एमडी ड्रग्जसह इतर मुद्दे आपण नीट हाताळले नाही. तो मुद्दा प्रचारात घेतला नसता तर आपला विजय झाला असता, असे बोलताच पांडे यांचा पारा चढला. पांडे विधानसभा प्रचारप्रमुख असल्याने त्यांनी दिंडेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली.

