Coastal Road : मुंबई किनारा मार्ग सोयीचा ठरत असला तरी या मार्गावरील बोगद्यात वेगमर्यादेचं उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ही माहिती समोर आली आहे. केवळ आठ दिवसांत १२० हून अधिक वाहनांनी वेगमर्यादा ओलांडत नियम मोडले आहेत. यामुळे अपघातही झाले आहेत.
वेगवेगळ्या प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे
१९ जुलैपासून आठ दिवसांत तब्बल १२० वाहनांनी बोगद्यातील वेगमर्यादा ओलांडली असून त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत सागरी मार्ग प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी १०.५८ किमी आहे. वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण मागांवर ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
Uttan Virar Sea Link : ‘उत्तन-विरार’ सी लिंकला हिरवा कंदील, पण सागरी सेतूसाठी 27 सूचना, तोडलेल्या झाडांच्या बदल्यात ५२ हजार झाडे लावणार
अपघात ओळखणारे, निगराणी करणारे, वाहन मोजणारे आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अशी वाहने ओळखण्यासाठी वाहन क्रमांक ओळखणारे सात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे सात कॅमेरे वेगमयांदा ओलांडणाऱ्या वाहनांची छायाचित्रे व त्यांच्या वाहन क्रमांकाची नोंद करतात. अशा एकूण २३६ कॅमेऱ्यांची नजर संपूर्ण सागरी किनारा मार्गावर आहे. हे कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले असल्याने वाहतूक पोलिसांना करणेही शक्य होत आहे.
Coastal Road : वाहनांवर आता २३६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर, कोस्टल रोडवर अपघात, वेगावर नियंत्रण ठेवणार
संपूर्ण किनारा मागांवर दोन किमी लांबीचा बोगदा असून या बोगद्यातून प्रवास करताना प्रतितास ६० किमीची वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. तर, उर्वरित मार्गावर प्रतितास ८० किमीची वेगमर्यादा आहे. मात्र बोगद्यातून प्रवास करताना वाहनचालकांनी वेगमर्यादेचे सरांस उल्लंघन केले आहे. १९ जुलै ते २६ जुलैपर्यंत १२० पेक्षा जास्त वाहनांनी बोगद्यातून प्रवास करताना वेगमर्यादा ओलांडली आहे. बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये वाहनांचे प्रकारही समजत आहेत. यात टोयोटा, मर्सिडिन, रेनॉल्ट, सुझुकी, होंडा आदी कंपनीची वाहने आहेत. वेगमर्यादा ओलांडल्यास दोन हजार रुपये दंड आकारला जात आहे.
Mumbai | समुद्राचं पाणी थेट कोस्टल रोडवर, पाण्यासह दगडंही आली, चालक वैतागले
आत्तापर्यंत नऊहून अधिक अपघात
सागरी किनारा मार्गाचा विस्तार सीलिंकपर्यंत करून तो वाहनचालकांसाठी मार्च २०२४पासून टप्प्याटप्प्यांत सुरू करण्यात आला. तेव्हापासून आत्तापर्यंत या मार्गावर वाहनांचे नऊहून अधिक अपघात झाले असून यात काही जण जखमीही झाले आहेत. वाहनाला आग लागण्याची घटनाही घडली आहे. यातील बहुतांश अपघात हे वाहने अतिवेगाने चालवणे आणि स्टंण्ट केल्याने झाले आहेत.

