Mumbai News: पार्किंगमुळे वाहतूककोंडी होत असल्याने गाड्या हटविण्यासाठी पोलिस गेले, त्यावेळी फसवणुकीचा हा धंदा उघडकीस आला. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी बेकायदा वसुली करणाऱ्यांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
मशिद येथील काही सय्यद स्ट्रीट, योगेश्वर सोसायटीसमोर वाहतुकीची कोंडी होत असल्याचे लक्षात आल्याने, पायधुनी पोलिसांचे पथक सार्वजनिक ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या गाड्या हटविण्यासाठी गेले. त्यावेळी गाडीमालक आणि चालकांनी पैसे भरून पार्किंग केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून पैसे आकारणाऱ्या नागराज पेनगौंडा याच्याकडे पार्किंगच्या परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले.
खंडाळा घाटातील विचित्र अपघाताचं कारण काय? तब्बल 24 वाहनांना धडक, एक महिला जागेवरच ठार, २१ जखमी
वाहनधारकांकडून दिवसाला शंभर रुपये आकारून त्यांना पे अँड पार्क असल्याचे भासवून फसवत असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांची आणि सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी नागराज याच्यावर गुन्हा दाखल केला.
असाच प्रकार मशिद येथील ब्रिज परिसरात आढळून आला. गेल्या काही वर्षांपासून मोनिरुल इस्लाम हा येथील नागरिक तसेच येणारे वाहनचालक यांच्याकडून पैसे घेऊन अनधिकृतपणे पार्किंगचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे आणि स्थानिक या नात्याने तो ही वाहने पार्क करून पैसे वसुली करीत असल्याचे समजले.
सार्वजनिक ठिकाणी व्हॅन पार्क करून वाहतुकीस अडथळा तसेच बेकायदा वसुली करून सरकार आणि नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मोनिरुल याच्यावरही पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
समृद्धी महामार्गावरील अपघात रोखणार ‘लूम ॲलर्ट’; नागपूर विद्यापीठाची अनोखी कल्पना, काय आहे इनोव्हेटिव्ह मॉडेल?
कमाईचा बेकायदा मार्ग
अधिकृत पार्किंग असल्याचे भासवून बेकायदा वसुलीचे प्रकार मुंबईत वारंवार घडत असतात. काही स्थानिक परिसरातील आपल्या दहशतीआधारे वाहने पार्क करून पैसे उकळतात. काही दिवसांपूर्वी अशीच घटना गिरगाव चौपाटी येथे उघडकीस आली होती. केएम मुन्शी मार्गावरील पालिकेचे ‘पे अॅन्ड पार्क’ असल्याचे सांगत तासाचे १०० रुपये घेतले जात होते. या प्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. कुर्ला पूर्वेकडील कुरेशी नगर येथील एमएमआरडीए वसाहत परिसरात पिता-पुत्र अवैध वाहन तळ चालवत होते.
अन्नधान्य उत्पादन महागले; हवामानबदलाचे तीव्र परिणाम उघड, किंमतीत जगभरात मोठी वाढ
रहिवासी-पोलिसांमध्ये खटके
मुंबईत मोठ्या प्रमाणात पुर्नविकास सुरू असला, तरी अनेक ठिकाणी जुन्या इमारती, चाळी आहेत. येथील रहिवाशांना वाहने ही रस्त्याकडेला पार्क करावी लागतात. त्यातच बाहेरील कुणी येऊन या ठिकाणी गाड्या पार्क केल्यास स्थानिकांचे त्यांच्यासोबत वाद होतात. याच पार्किंगवरून दक्षिण आणि मध्य मुंबईत अनेकदा स्थानिक नागरिकांचे पोलिसांसोबत खटके उडल्याची उदाहरणे आहेत.

