• Fri. Mar 13th, 2026
    Ajit Pawar: कामाच्या आड मी आलो तरी गुन्हा दाखल करा; हिंजवडीत अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर

    Ajit Pawar Hinjewadi Visit: कोणी विकासाच्या आड येत असेल, तर त्यांच्यावर खटले दाखल करा. हिंजवडी दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.

    ajit pawar hinjewadi (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: हिंजवडीतून आयटी उद्योग बाहेर जात आहेत. आपले वाटोळे झाले. तरीही आपण सुधारणार नाहीत का? असे खडे बोल सुनावत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. कोणी विकासाच्या आड येत असेल तर त्यांच्यावर खटले दाखल करा. पण थांबू नका, अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

    दोन आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी हिंजवडीतील आयटी पार्क परिसराचा दौरा करून सुधारणेच्या आणि सोयी-सुविधांच्या अनुषंगाने प्रशासनाला सूचना केल्या होत्या. त्याचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी शनिवारी सकाळी सहा वाजताच हिंजवडीचा दौरा केला. यावेळी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे मंदिर पाडू नये, असा आग्रह पवार यांच्याकडे धरला. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी ‘धरणे बांधताना मंदिरे जातातच. तुम्हाला जे सांगायचे आहे, ते मी ऐकून घेतो. पण, मला काय करायचे ते करतो. आपले वाटोळे झाले आहे. येथील आयटी पार्क बाहेर जात आहेत. तरी तुम्हांला काही पडलेले नाही. सुधारणा केल्याशिवाय गत्यंतर नाही’, असे खडे बोल सुनावले.
    खंडाळा घाटातील विचित्र अपघाताचं कारण काय? तब्बल 24 वाहनांना धडक, एक महिला जागेवरच ठार, २१ जखमी
    हिंजवडीतील रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक कोंडी या समस्यांवर लक्ष केंद्रीत करून पवार यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या. स्थानिक नागरिकांचे म्हणणे जरूर विचारात घ्या. आवश्यक ठिकाणी पर्यायी तोडगा काढा. मात्र, विकासाच्या आड कोणी येत असेल तर त्यांच्यावर खटले दाखल करा, असे स्पष्ट आदेश पवार यांनी पोलिसांना दिले. यावेळी पीएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महापालिका, महामेट्रो आदी यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
    Chandrashekhar Bawankule: हिंमत असेल तर मंत्र्यांची नावे घेऊन आरोप करा; संजय राऊतांना बावनकुळेंचे आव्हान
    हिंजवडीमधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. दर आठ ते दहा दिवसांनी आढावा घेत आहोत. ही चांगली सुरुवात आहे. अखेरपर्यंत कामाचा वेग कायम राखण्याचा प्रयत्न राहील. विकास करताना प्रसंगी नाइलाजान नाईलाजाने काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील. -उपमुख्यमंत्री अजित पवार

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा