• Tue. Mar 10th, 2026

    तापमानवाढीचा नागपूरला धोका; रब्बी पिके व मानवी आरोग्य धोक्यात, नीरीचा अभ्यास

    तापमानवाढीचा नागपूरला धोका; रब्बी पिके व मानवी आरोग्य धोक्यात, नीरीचा अभ्यास

    Nagpur tempreture: शहरातील वाढत्या तापमानामुळे रब्बी हंगामातील शेती व मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

    nagpur tempreture (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    ललित पतकी, नागपूर : हवामान बदलाचे परिणाम आता नगरी जीवनावर ठळकपणे दिसू लागले आहेत. विशेषतः २००० नंतरच्या वर्षांमध्ये शहरातील तापमान वाढीचा ठोस ट्रेन्ड दिसून येत आहे. हा फटका आता नागपूरलासुद्धा बसू शकतो. शहरातील वाढत्या तापमानामुळे रब्बी हंगामातील शेती व मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

    शहरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने केलेल्या शास्त्रीय अभ्यासातून हे सत्य समोर आले आहे. शहरात होत असलेल्या सिमेंटीकरणामुळे रस्त्यांवरील वृक्षांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा दावा करणारी जनहित याचिका शरद पाटील आणि इतर तीन पर्यावरणतज्ज्ञांनी दाखल केली असून ती प्रलंबित आहे.
    पश्चिम विदर्भात मुसळधार! 4 तासांच्या संततधारेने अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यांत पूर; दोघांचा मृत्यू
    या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मनपाने अलीकडेच शहराचा पर्यावरण (२०२३-२४) अहवाल सादर केला. नीरीने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालात नीरी शहराच्या पर्यावरणाशी निगडित विविध मुद्यांवर अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदविली आहेत. यात १९७० ते २०२४ या कालावधीतील तपशीलवार अभ्यासात स्पष्ट झाले की २००० नंतरच्या सुमारे ७५ टक्के वर्षांमध्ये नागपूर शहरातील सरासरी कमाल तापमानात वाढ झाली आहे.
    खेळता-खेळता चिमुकल्याशी वाद, मध्यरात्री गेले अन्…, जालना आश्रमशाळेतील 2 अल्पवयीन मुलांचं भयंकर कृत्य
    विशेष बाब म्हणजे उन्हाळ्याच्या तुलनेत मान्सून, मान्सूननंतर व हिवाळ्याच्या कालावधीत ही वाढ अधिक ठळक आहे. मान्सून काळाचा विचार केल्यास, यातील दहा पैकी नऊ वर्षांमध्ये, तर मान्सूननंतरच्या काळात तब्बल ८७.५ टक्के वर्षांमध्ये या तापमान वाढीचा ट्रेन्ड दिसून आला. हिवाळ्यातही ७० टक्के वर्षांमध्ये हा ट्रेन्ड दिसतो. विशेषतः हिवाळ्यातील वाढत्या तापमानामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, तूर यासारख्या पिकांच्या उत्पादनावर थेट परिणाम होण्याची भीती आहे. तापमान वाढीमुळे वनस्पतींच्या वाढीचा कालावधी कमी होतो, परागसिंचनात अडथळा येतो आणि उत्पादनात घट होते.
    सुनील तटकरेंच्या सांगण्यावरुनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण; मनोज जरांगेंचा गंभीर आरोपमानवी आरोग्याला त्रासदायक
    वाढत्या तापमानामुळे खालच्या स्तरावरील ओझोन पातळीत वाढ होते. यामुळे हवेची गुणवत्ता खालावते व त्यामुळे दमा, फुफ्फुसांचे आजार, त्वचारोग, डोळ्यांची जळजळ अशा विविध त्रासांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यातील उष्णतेमुळे कोरडे दुष्काळ, वणवे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्येही वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा