• Wed. Mar 11th, 2026
    उड्डाणपूल अतिशय अडचणीचा ठरेल, सर्वसामान्यांचा तीव्र विरोध, अखेर नितीन गडकरींचा मोठा निर्णय

    Nandurbar News : शेवाळी ते नेत्रग महामार्गावरील उड्डाणपूल रद्द करण्यात आला आहे. भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नितीन गडकरी यांच्याकडे या प्रकल्पावर चिंता व्यक्त केली होती. नागरिकांच्या सोयीसाठी गडकरी यांनी निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

    महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. शेवाळी ते नेत्रग महामार्गावरील तुलसी हॉस्पिटलपासून संत कवरदास चौकापर्यंतचा उड्डाणपूल रद्द झाला आहे. भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन या उड्डाणपुलाला विरोध दर्शवला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी गडकरी यांनी तत्काळ निविदा रद्द करण्याचे आदेश दिले.

    शेवाळी ते नेत्रग महामार्ग अंतर्गत नंदुरबार शहरामध्ये नियोजित तुलसी हॉस्पीटल पासुन संत कवरदास चौक पर्यंतचा उड्डाणपुलची निविदा काढण्यात आली होती. मात्र या उड्डाणपूलास या भागातील व्यापारी तसेच रहिवाशी व भाजपा पदाधिकारी यांनी विरोध केला होता.भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केंद्रिय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नियोजित उड्डाणपुलाची निविदा तात्काळ रद्द केली.

    दुर्गम, आदिवासी भागांमध्ये कुपोषणचिंता कायम; ‘या’ जिल्ह्यांत चिंताजनक स्थिती, काय सांगते आकडेवारी? शहरातील नवापूर चौफुली, धुळे चौफुली, करण चौफुली आणि सी.बी. पेट्रोल पंप येथे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. मात्र, तुलसी हॉस्पिटल ते संत कवरदास चौकापर्यंतच्या उड्डाणपुलामुळे शहरातील नागरिकांना आणि व्यावसायिकांना खूप त्रास होणार होता. त्यामुळे नागरिकांनी या उड्डाणपुलाला विरोध केला. हा उड्डाणपूल तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही, तसेच तो अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकला असता.

    डोक्यात हवा जाऊ न देता वागा; वादग्रस्त मंत्री, आमदारांना एकनाथ शिंदेंकडून कानपिचक्या, काय म्हणाले? या रस्त्यावर शाळा, कॉलेज, मंदिरे आणि वस्ती असल्यामुळे उड्डाणपूल झाल्यास मोठी अडचण निर्माण झाली असती. विजय चौधरी यांनी नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नितीन गडकरी यांना निवेदन दिले. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत “शहरी भागातील सी.बी. पेट्रोल पंप अर्थात तुलसी हॉस्पिटल पासुन संत कवरदास चौक पर्यंतचा वाहया (डक) पुल, उडडाणपुलाची निविदा रदद करण्याबाबत तसेच पुढील आदेश पर्यंत हे काम स्थगित करण्याचे आदेश” अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे शहरातील उड्डाणपूल रद्द झाल्याने व्यापारी आणि नागरिकांना मोठा दिलासामिळाला आहे.

    शेवाळी ते नेत्रग महामार्गावरील तुलसी हॉस्पिटलपासून संत कवरदास चौकापर्यंतच्या उड्डाणपूलाच्या निर्मितीला स्थगिती मिळणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारण फायद्याच्या नसलेल्या या उड्डाण पुलाच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणारा पैसा वाया गेला असता असे काही नागरिकांनी म्हटले.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा