• Sat. Mar 14th, 2026

    ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर मोठा ट्विस्ट; शिंदेंचा खास माणूस राज ठाकरेंना भेटणार, म्हणाले, आमची मैत्री…

    ठाकरे बंधूंच्या मेळाव्यानंतर मोठा ट्विस्ट; शिंदेंचा खास माणूस राज ठाकरेंना भेटणार, म्हणाले, आमची मैत्री…

    ठाकरे बंधूंचे मनोमिलन झाल्यावर राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेला या युतीचा स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये फटका बसू शकतो. मात्र दोघ भावांच्या मनोमिलनानंतर शिंदेंचा खास माणूस राज ठाकरेंची भेट घेणार आहे. कोण आहेत ते खास जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    रत्नागिरी, प्रसाद रानडे : मनसे अध्यक्ष राज साहेबांचे भाषण मराठी आत्मीयतेचं होत तर दुसरं भाषण फस्ट्रेशनवालं होतं, स्वार्थासाठी होतं अशी जहरी टीका उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. राजकीय एथिक्स पाळून राज ठाकरे यांनी टीका केली पण दुसरं भाषण हे फस्ट्रेशनवालं होत. कुठच्याही भाषणात उद्योग हा विषय येतो, त्यामुळे मी समाधानी आहे, असाही टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. राज साहेबाशी माझे संबंध राजकारणा पलीकडे आहेत, मी त्यांना भेटणार आहे, जर गप्पा मारायला वेळ दिला तर मी भेटणार आहे, राजकारणापलीकडेही मैत्री असते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

    जो प्रतिसाद राज ठाकरेंच्या भाषणाला होता, तो दुसऱ्या भाषणाला निम्माही नव्हता. एक भाषण मराठीच्या कल्याणाचं होतं, दुसरं भाषण सत्तेसाठी होतं. मराठी माणसाच्या नावावर आजचा मेळावा घेऊन अनेकांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेला टिकेबद्दल विचारला असता ते म्हणाले की त्यांनी काही इथिक्स पाळून टीका केली पण यावर प्रतिक्रिया देऊन परिपक्व राजकारणी कसा असतो हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिल्याचं अशा शब्दात सामंतांनी मुख्यमंत्र्यांचेही कौतुक केलं आहे.
    राज ठाकरेंनी कुठेही ‘तसं’ म्हटलेलं नाही; शिंदेंच्या मंत्र्यांचं थेट मुद्द्यावर बोट
    सावरकरांना काँगेसने शिव्या का घातल्या? या शिव्या देणाऱ्या काँग्रेसची साथ उद्धव ठाकरे सोडणार का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या गुजराती या शब्दाबद्दल सुरू असलेल्या वादाबद्दल ते म्हणाले यापूर्वी उद्धव ठाकरे यांनीही जय गुजराती असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर वरळीमध्ये केम छो हे बॅनर आम्ही पाहिलेल आहे. राज ठाकरेंनी कुठेही आम्ही एकत्र येऊ असं म्हटलेलं नाही, आजचा मेळावा मराठीपुरता मर्यादित होता, हे राज ठाकरेंनी त्यांच्या विधानातून अधोरेखित केल आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याबरोबर एकत्र आले मेळावा झाला म्हणजे अजून त्यांची युती नाही, अजून बोलणी झालेली नाही, मेळावा झाला म्हणजे जागावाटप तिकीट वाटप झाल असं नाही अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही त्यामुळे जर तर वर बोलण्यात अर्थ नाही. आम्ही हिंदीची सक्ती महायुती सरकारने केलेली नव्हतीच, ऑप्शनल होती आमच्या विरोधात हे सगळे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबईला महाराष्ट्रापासून दूर करू देणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितल्याचं सामंत म्हणाले.
    मराठीचा मुद्दा राजकीय दृष्ट्या पुढे आणला जातोय; रामदास कदम यांच्या शिलेदाराने सुनावले खडेबोल
    मुंबई गोवा महामार्गाची आजही पाहणी केली, अधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. पुढच्या पावसाळ्यात खड्ड्यांची तक्रार येणार नाही, चिपळूणचा ओव्हरब्रिज मार्च पर्यंत पूर्ण होईल. दुसरी महत्त्वाची बाब अशी की महामार्गावर पाली येथे छत्रपतींच्या पुतळ्याचे काम सुरू झाल आहे. फ्लायओव्हरवरून हा महाराजांचा पुतळा दिसेल अशीही माहिती त्यांनी दिली. उद्योजकाचं ते वैयक्तिक मत आहे. त्यांचं हे वक्तव्य चुकीचं, त्याला महाराष्ट्रावर टीका करण्याचा अधिकार नाही असेही सामंत यांनी सुनावलं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा