Nanded Marathi News : नांदेड जिल्ह्यातील सूरज जाधव या विद्यार्थ्याने वडिलांच्या निधनानंतरही दहावीची परीक्षा दिली. त्याने ५५.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी येथे त्याचे मूळ गाव आहे. सूरजचे वडील संजय जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. दुःखाच्या परिस्थितीतही त्याने इंग्रजीचा पेपर दिला. मुख्याध्यापक अरविंद राठोड यांनी त्याला मदत केली. सूरजच्या शिक्षणाची जबाबदारी आता शाळेने घेतली आहे
सुरज जाधव हा यवतमाळ जिल्हयातील उमरखेड तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. तो नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील इंदिरा गांधी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. किनवट येथील सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर त्याने परिक्षा दिली आहे. १ मार्च रोजी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास सुरजचे वडील संजय जाधव यांचे दिर्घ आजाराने निधन झाले होते. या दिवशी सूरजचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. या दुखातून सावरणे त्याला कठिण होते. तो परिक्षा देण्याच्या मानसिकतेत नव्हता. त्याने शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून मी परीक्षा देऊ शकत नाही असे सांगितले होते.
Career Options After Class 10th: निकाल लागला आता पुढे काय? दहावीनंतरच्या करिअर संधी; योग्य पर्याय निवडण्यासाठी मार्गदर्शन
मुख्याध्यापक राठोड यांनी त्याच्या टाकळी गावी जाऊन सुरजचे सांत्वन करत परिक्षेसाठी तयार केले. वडिलांना मुखाअग्नी देऊन सूरजने इंग्रजी विषयाचा पेपर दिला. इंग्रजी विषयात त्याने ३५ गुण मिळवले आहे. ज्या परिस्थितीत त्याने यश मिळवले ते कौतुकास्पद आहे. सुरजच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवल्याने कुटूंबाचीही जबाबदारी त्याच्यावर आली आहे. आई व एक बहिणी असून ती इयत्ता बारावीत शिकत आहे. सध्या सुरज मिळेल ते काम करत घर चालविण्यासाठी हतभार लावत आहे.
CBSE Result 2025: ‘सीबीएसई’ बोर्डाचा निकाल जाहीर! बारावीचे ८८.३९ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण, SMS द्वारे जाणून घ्या गुण
दरम्यान, सुरजला हा अभ्यासा हुशार आहे. मात्र, ऐनवेळी दुखाद घडली. त्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे तो पुढील शिक्षण घेऊ शकत नाही. अश्या परिस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांनी सूरज जाधव याच्या शिक्षाची जाबाबदारी घेतली आहे. त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न राहिल, असे गोकुंदा येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद राठोड यांनी सांगितले.
