• Sat. Mar 7th, 2026

    Jalna News : लग्न लागले, सुहागरातीच्या पहिले नवरी रफूचक्कर! लग्नाच्या नावाखाली बबलीचा ‘गेम’

    Jalna News : लग्न लागले, सुहागरातीच्या पहिले नवरी रफूचक्कर! लग्नाच्या नावाखाली बबलीचा ‘गेम’

    Jalna Bride Ran Away : लग्नाला मुली मिळणं आजच्या काळात खूप कठीण झालं आहे. त्यामागील कारणदेखील तसंच आहे. सध्या मुलीच्या आई-वडिवांच्या आणि मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशा अपेक्षांमुळे अनेक मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयत. पण याच परिस्थितीचा फायदा घेत काही टोळी मुलांना आणि त्यांच्या नातेवाईकांना फसवत असल्याचं समोर येत आहे. जालन्यात अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे.

    (फोटो– Lipi)

    संजय आहेर, जालना : जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या नावाखाली एका बबलीने नवऱ्या मुलाला दीड लाख रुपयांचा चुना लावला. जालना जिल्ह्यातील राजूर परिसरातील संबंधित घटना उघडकीस आली आहे. लग्नाचा नावाखाली काही टोळी तरुणांची फसवणूक करत असल्याचं समोर येत आहे. जालन्यातील घटनेत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीड लाख रुपये घेऊन नवरीसह तिची बहीण फरार झाली. ही घटना 9 मे ला राजूर शिवारात घडली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आङे. तसेच टेंभुर्णी पोलिसांनी या बनावट लग्नातील दोन मध्यस्थींना ताब्यात घेतले आहे. कल्याणी मजर कुरेशी (वय २९), शेख पाशा शेख ताजू (वय ४५) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.

    जाफराबाद तालुक्यातील खामखेडा येथील एका मुलाच्या लग्नासाठी मध्यस्थ्यींमार्फत मुलगी पाहण्यात आली होती. पण लग्नासाठी अडीच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. वराकडील मंडळींनी मध्यस्थींची ही अट मान्य केली. त्यानंतर मध्यस्थींनी नवरी मुलगी आणि तिच्या बहिणीला खामखेडा येथे आणून लग्नाचे सोपस्कार करायला प्रारंभ केला. त्यानुसार वराकडील मंडळींनी मुलगी आणि तिच्या बहिणीला नगदी दीड लाख रुपये दिल्यानंतर 8 मे ला विवाह खामखेडा येथे झाला.

    देवदर्शनासाठी जाते असं सांगून गेली अन्…

    लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधू आपल्या बहिणीसह राजूर येथे देवदर्शनासाठी जाते असं सांगून गेली अन् तेथूनच त्या दोघी पसार झाल्या. नववधू परत न आल्याने पतीसह वराकडील मंडळीत एकच खळबळ उडाली. अखेर नवरदेव मुलाच्या भावाने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे एपीआय सचिन खामगळ आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून दोन मध्यस्थींना ताब्यात घेतले. वधूसह तिच्या बहिणीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

    जालना जिल्ह्यात यापूर्वी देखील अशा घटना घडल्याचे उघड झाले होते. त्यातील एक टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली होती. उत्तरप्रदेशमधील एक टोळी सक्रिय झाली होती. त्यांनी देखील यापूर्वी अनेक जणांना फसवले होते. या टोळीतील दोन महिला आणि एक पुरुष पोलिसांनी ताब्यात घेतला होता. राज्यात मुलांना मुली मिळत नाही म्हणून या संधीचा फायद घेत काही लोकं तरुणांना फसवत आहेत.

    दोघांना पोलीस कोठडी

    टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कल्याणी मजर कुरेशी, शेख पाशा शेख ताजू यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    आधारमुळे लग्न केले होते रद्द

    प्रारंभी कोर्टातून लग्न करायचे म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे दाम्पत्याला नेण्यात आले होते. तिथे मुलीचे आधारकार्ड अपडेट होत नव्हते. दोन दिवसांपूर्वी मोबाईल हरवल्याचे मुलगी सांगत होती. त्यामुळे ते लग्नही मोडले होते. मुलाकडील नातेवाईकांना संशय आल्याने ते लग्नही मोडले होते. पण सायंकाळी मुलीकडील नातेवाईकांचा फोन आल्यानंतर आणि विश्वासात्मक बोलल्याने लग्न लावण्यात आले होते.

    संजय आहेर

    लेखकाबद्दलसंजय आहेरसाधना न्युज मध्ये २ वर्ष जिल्हा प्रतिनिधी.
    रफ्तार न्युज मध्ये १ वर्ष जिल्हा प्रतिनिधी,
    आधार न्युज मध्ये ५ वर्ष जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले आहे.
    सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये स्ट्रेंजर म्हणून जालना जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed