• Sun. Jun 14th, 2026
    मातब्बर नेत्यांना नाही जमलं ते सरपंचानं करून दावलं, 27 वर्षांनी गावात पाणी आलं

    Chhatrapati Sambhaji Nagar News- औद्योगिक जिल्हा म्हणूून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका गावात सरंपंचाच्या प्रयत्नांनी तब्बल 27 वर्षांनी पाणी आले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    सुशील राऊत,छत्रपती संभाजीनगर: देशातील सर्वात वेगाने विकसित होणारा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजी नगरचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी अक्षरशः तरसत आहे. या जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना जे जमलं नाही ते खुलताबाद तालुक्यातील एका गावच्या सरपंचाने करून दाखवलं. 27 वर्ष पाण्यापासून वंचित असलेल्या गावात सरपंचाच्या दोन वर्षाच्या मेहनतीमुळे आज प्रत्येक घरात पाणी उपलब्ध झालं. अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली. गावात पाणी आल्याने मायमाऊल्यांनी जलपूजन करत गावकऱ्यांनी दिवाळी सारखा जल्लोष केला.

    ही कहाणी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असलेल्या वडगाव या गावची. खुलताबाद तालुक्यातील वडगाव हे छोटसं गाव. गावात 75 घरी असून या गावची लोकसंख्या 575 एवढी आहे. या गावात पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आभाळ वृद्धांसह महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागायची. टंचाईच्या काळामध्ये गावातील नागरिक हातपंप अन् अधिग्रहण केलेल्या विहिरीवर अवलंबून राहत. गावातील 27 वर्षापासून असलेली अडचण सरपंच करणसिंग राजपूत यांनी मनावर घेतले.

    मोदी सरकारने 2021-22 यावर्षी जलजीवन मिशन या योजनेची घोषणा केली. या जलजीवन मिशनच्या अंतर्गत सर्व राज्यातील प्रत्येक गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आदेश ग्रामपंचायतीला आदेश देण्यात आले. या योजनेच्या अंतर्गत सर्वे करून आराखडा तयार करण्यात आला.

    दोन वर्षांची मेहनत
    गावात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरपंच करण सिंग राजपूत यांनी सोबलगाव धरण परिसरामध्ये विहिरीचे खोदकाम केले. हे संपूर्ण काम तब्बल दोन वर्ष चालू होते. धरण परिसरातून गावात उपलब्ध करून देण्यासाठी जलवाहिन्या अंथरण्यात आल्या. भविष्याचा विचार करून 50 हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारून घराघरांमध्ये नळ कनेक्शन देण्यात आले. माणसांसोबत जनावरांसाठी देखील मोठा हौद तयार करण्यात आला. गावचे सरपंच करण सिंग राजपूत, सोमीनाथ तुरेवाल, भाऊसाहेब विधाटे, ग्रामविकास अधिकारी सचिन बनसोडे, उपसरपंच विठ्ठल साळुंखे यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं. वडगाव या गावात आज घराघरात पाणी उपलब्ध झाल.

    राज्यातच नव्हे तर देशात वेगाने विकसित होणार औद्योगिक शहर, ऐतिहासिक शहर, पर्यटनाने समृद्ध असलेल्या शहर म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची बोंब उडाली आहे. शहराच्या जवळ असलेल्या जायकवाडी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना देखील शहराला आठ ते दहा दिवस आड पाणी पुरवले जात होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *