• Sun. Mar 8th, 2026
    डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी सीआयडी चाैकशीची मागणी

    Solapur News : सोलापूरमधील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी संशय व्यक्त केला आहे की, पोलीस मुख्य आरोपींपर्यंत पोहोचलेले नाहीत, असाही त्यांनी आरोप केलाय.

    (फोटो– Lipi)

    इरफान शेख, सोलापूर : राज्याच्या वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणाऱ्या डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मुख्य संशयीत आरोपीपर्यंत पोलीस पोहोचले नाहीत. सीआयडी चौकशी केली तर मुख्य आरोपीला बेड्या पडतील अशी प्रतिक्रिया प्रहार पक्षाचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केली आहे.

    डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का

    एसपी न्यूरोसायन्स हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी असलेल्या मनीषा मुसळे माने सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलीस प्रशासन सर्व अँगलने तपास करत आहेत. डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी सोलापूरमधील त्यांच्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने सोलापूरसह राज्यातील वैद्यकीय क्षेत्राला जबरदस्त हादरा बसला.
    Solapur News : अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेऊन तुळजापूरला निघाले, वाटेत कुटुंबावर काळाचा घाला; पुण्यातील एकाचा मृत्यू, चार जखमीवळसंगकर प्रकरणात सीआयडी चाैकशीची मागणी

    अंत्यविधी झाल्यानंतर 19 एप्रिल रोजी रात्री न्यायालयाच्या परवानगीने वळसंगकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनीषा मानेला सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास सुरू केला. पोलिसांनी जवळपास 5 दिवस पोलीस कोठडीची मागणी करत मनीषा मानेची चौकशी केली. पोलिसांचा तपास मनीषा मानेंच्या पुढे गेला नाही. इतका मोठा डॉक्टर हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करू शकत नाही अशी माहिती मनीषा माने यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी यापूर्वीच सांगितली आहे.

    डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी सीआयडी चाैकशीची मागणी, हा नेता मैदानात

    मनीषा मुसळे माने सध्या न्यायालयीन कोठडीत

    प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी डॉ शिरीष वळसंगकर आत्महत्येबाबत दुःख व्यक्त केले. डॉ वळसंगकर यांच्या आत्महत्येने सोलापूरचे आणि राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशा महान व्यक्तीच्या मृत्यूची सखोल तपासणी व्हावी, त्यांच्या आत्महत्येस जे कुणी जबाबदार असतील त्यांवर कठोर शासन व्हावे, स्थानिक पोलिसांकडून हा तपास सीआयडी तपास यंत्रणेकडे द्यावा अशी मागणी प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी केली आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed