Navnath Waghmare Slams Manoj Jarange Patil :जालन्यामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे हे पिसाळलेले माकड असून ते प्रसिद्धीसाठी काहीही करतात, असे वाघमारे म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आरोप केले. शिंदे आणि जरांगे यांच्यात साटेलोटे असल्याचा दावा वाघमारे यांनी केला. ओबीसींनी बांगड्या भरल्या नाहीत, असा इशाराही वाघमारे यांनी जरांगेंना दिला.
“लोकांची गर्दी राहिली नाही. ओबीसी नेत्यावर उलट-सुलट बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याचा जरांगेचा प्रयत्न आहे. मराठा समाजाला पूर्ण माहित आहे, जरागे म्यानेज आहे. जरांगे रसद मिळविण्यासाठी कुठेतरी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी नवीन-नवीन उदयोग करण्याचे काम करतो. जरांगेला अक्कल आहे का? जरांगेला आरक्षण काय आहे हेच माहीत नाही. जरांगेने कुठला अभ्यास केला, जरांगे काय घटना तज्ञ, न्यायधीश आहे का?”, असे सवाल नवनाथ वाघमारे यांनी केले.
नवनाथ वाघमारे यांची एकनाथ शिंदेंवर टीका
“एकनाथ शिंदेंच्या वाशीमधून म्यानेज होऊन वापस आलेला आहे. आता सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याची सेटींग आहे. एकनाथ शिंदेंचे मंत्री जरांगेला वारंवार भेटायला येतात. एकनाथ शिंदे आणि जरागेचं साटंलोट आहे. एकनाथ शिंदेंकडून खोके घ्यायचे आणि जरांगेला द्यायचे. जरांगेने वारंवार एकनाथ शिंदेंचा उदो-उदो करायचा, एकनाथ शिंदे आणि जरांगेचा खेळ चाललेला आहे, एकनाथ शिंदे जातीवादी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. जाती-जातीत भांडण लावणारा पिसाळेल जरांगे माकड आहे, त्यामुळे दोघांना महत्त्व देणं योग्य नाही”, अशी खोचक टीका नवनाथ वाघमारे यांनी केली.
‘ओबीसींनी हातात बांगड्या भरल्यात का?’
“जरांगे काही भूमिका जाहीर करीत नाही. जरांगेने दादागिरीची भाषा करू नये, ओबीसींनी हातात बांगड्या भरल्यात का? जरांगेत दम असेल तर रस्त्यावर ये ना, ओबीसीशी भांडण करावे वाटते ना, तू दंडूके हातात घे आम्ही पण दंडूके हातात घेऊ”, असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला.

