सर्वपक्षीय बैठकीस अनुपस्थितीवरुन उबाठावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल
सर्वपक्षीय बैठकीत अनुपस्थितीवरुन उबाठावर शिंदेंनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘देशाच्या सुरक्षेसाठी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्ष गेले; पण उबाठा गेले नाही. हेच का यांचे देशप्रेम, हीच का देशभक्ती,’ असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे केला. ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात यांना राजकारण दिसते. काहीतरी जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. मला शिव्या देण्यात आणि आरोप करण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे,’ अशी टीकाही शिंदे यांनी केली.
