Jalgaon News : जळगावात एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. हर्षल थाडे या मुलाला चालता येत नसल्याने रुग्णालयात दाखल केले होते, जिथे डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. उपचारासाठी कुटुंबियांनी व्याजाने पैसे जमा केले,
दोन दिवसापूर्वी जळगाव शहरातील एका खाजगी रूग्णालयामध्ये जावळे डॉक्टरांकडे तीन वर्षाच्या चिमुकल्याला ऍडमिट करण्यात आले. मुलाला कोणताही आजार नव्हता. त्याला फक्त चालता येत नसल्याने कुटुंबिय डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला पुण्यावरून आलेल्या डॉक्टरांकडून पन्नास हजाराचे इंजेक्शन दिले आणि थेट त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांनी केलाय. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये वडिलांच्या सह्या घेऊन मुलाचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नाही.
महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंधांचे आरोप, Girish Mahajan अॅक्शन मोडवर, खडसे अडचणीत येणार?आम्ही मोलमजुरी करून त्या डॉक्टरांना व्याजाने पैसे काढून ५० हजार रुपये दिले आणि जमा केले. अगोदर आम्हाला ८० हजाराचे इंजेक्शन असल्याचे सांगितले. त्यानंतर तीस हजार रुपये कमी करून १५००० घेतले त्यानंतर ३० हजार अजून जमा केले, असे कुटुंबियांनी सांगितले. संबंधित पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मात्र, तिथे त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. जोपर्यंत डॉक्टरांवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तीन वर्षाच्या लेकराचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असे पालकांनी सांगितले.
इंजेक्शन देताच तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबियांनी घेतले होते व्याजाने पैसे, डॉक्टरांवर गंभीर आरोप
तीन वर्षाच्या चिमुकल्याचे ना हर्षल थाडे आहे. त्याला चालण्यास समस्या येत असल्याने त्याला रूग्णालयात नेण्यात आले आणि त्याला डॉक्टरांनी इंजेक्शन दिले आणि त्याचा मृत्यू झाला. बाळाचा शवविच्छेदन करून बाळाच्या पालकांच्या सह्या देखील घेण्यात आल्या. मात्र, मृतदेह ताब्यात न देता डॉक्टर कर्मचारी शवविच्छेदन विभागाला कुलूप लावून घरी गेले. डॉक्टर जावळे यांनी या उपचाराची जबाबदारी घेतली होती, असे पालकांचे म्हणणे आहे.

