Harshwardhan Sapkal: थोपटे यांना विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याची असलेली संधी त्यामुळे हुकली,’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी गौप्यस्फोट केला.
गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘युवा अल्पसंख्याक संसद’ या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते. भोरचे माजी आमदार थोपटे सध्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत त्यांचा अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे अस्तित्व पुन्हा धोक्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारता सपकाळ यांनी गौप्यस्फोट केला. ‘फडणवीस यांनी संग्राम थोपटेंना अध्यक्षस्थानापर्यंत पोहोचू दिले नाही. त्यांना या पदापासून वंचित ठेवण्याचे काम फडणवीस यांनी केले. थोपटे अध्यक्ष झाले असते, तर चांगल्या माणसाला सभागृहाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती. शिवसेना पक्ष फोडताना कायद्याची ऐशीतैशी करण्यात आली. थोपटे अध्यक्ष असते, तर त्यांनी हे होऊ दिले नसते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फुटू दिला नसता,’ असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २० एप्रिलपासून भिडे पूल वाहतुकीसाठी राहणार बंद; काय कारण?
‘भोरमधील थोपटे कुटुंबीय काँग्रेसमधील मोठे नेतृत्व आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेससोबत घालविले आहे. ते दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी काँग्रेसमध्ये राहावे. काँग्रेसचे त्यांना नेतृत्व करायचे असेल, तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पक्ष सोडण्याचा आत्मघातकी निर्णय त्यांनी घेऊ नये,’ असेही सपकाळ यांनी सांगून त्यांना पक्षात राहण्याचा आग्रह धरला आहे.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत नुकतचे भाष्य केले. त्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत विचारता, महाराष्ट्रापेक्षा आमचा वाद मोठा नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. याचा अर्थ भाजपने महाराष्ट्राचे नुकसान केले आहे. उद्योग, व्यवसाय राज्याबाहेर जात आहेत. महायुती महाराष्ट्राचे नुकसान करीत आहे, असा राज ठाकरे यांचा इशारा आहे. भाजपने राज ठाकरे यांचा भ्रमनिरास केला आहे, याकडे सपकाळ यांनी लक्ष वेधले.
Sangram Thopate : पुणे जिल्ह्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, संग्राम थोपटेंकडून राजीनामा, पुढचा प्लॅन काय?
थोपटेंच्या राजीनाम्याबद्दल मौन
माजी आमदार संग्राम थोपटे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ई-मेलद्वारे राजीनामा दिला आहे. त्यावर भाष्य करण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी टाळले. ‘यापूर्वी अनेक नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. त्या सगळ्यांना संपवले. थोपटे यांना संपविण्याचा घाट असू शकतो. थोपटे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये. आम्ही त्यांच्या संपर्कात असून, संवाद साधू. रवींद्र धंगेकर यांचा विषय वेगळा असून, राजकारणात सगळे दिवस सारखे नसतात. आगामी काळ काँग्रेसचा असेल,’ असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
रुग्णालयास वाचवायचा डाव
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणाबाबत ससून रुग्णालयाच्या अहवालाकडे लक्ष वेधता, ‘सरकारला हे प्रकरण दडपायचे आहे; म्हणून ते चुकीची बाजू घेत आहेत. हे रुग्णालय रुग्णसेवेसाठी आहे; पण ते धंदा करीत आहे. रुग्णालयाला वाचविण्याचे काम देवेंद्र फडणवीस करीत आहेत,’ असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

