• Sun. Mar 15th, 2026
    खैरे-दानवे वादावर प्रश्न, दानवेंची आगपाखड; हात जोडले आणि म्हणाले, ‘काड्या करणं बंद करा’

    Ambadas Danve slams media over Chandrakant Khaire : तुमच्यात आणि खैरेंमध्ये वाद मिटले मात्र ते आज गैरहजर आहेत, असा प्रश्न विचारला. यावर पत्रकारांनी काड्या करू नये, अशी आगपाखड दानवेंनी केली आहे.

    Lipi

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे ठाकरे गटाने ‘लबाडांनो पाणी द्या’ या आंदोलनाची घोषणा केली आहे. यासंबंधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) गैरहजर होते. त्याबाबत पत्रकारांनी तुमच्यात आणि खैरेंमध्ये वाद मिटले मात्र ते आज गैरहजर आहेत, असा प्रश्न विचारला. यावर पत्रकारांनी काड्या करू नये, माझी तुम्हाला हात जोडून विनंती, असं म्हणत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांवर आगपाखड केली.

    छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र असं असतानाही शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणी येत आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाने ‘लबाडांनो पाणी द्या’ असे आंदोलन पुकारले. याबाबत माहिती देण्यासाठी १७ एप्रिलला दुपारी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संबोधित करत होते त्याचबरोबर इतर पदाधिकारी उपस्थित होते. मात्र शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे गैरहजर होते. पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाची माहिती दिली. शहराला पाणीपुरवठा मिळावा यासाठी समांतर पाणी कुठे योजना आणली. मात्र भाजपने ही योजना बंद पडली. योजना बंद पाडण्यासाठी भाजपने वेगवेगळे आंदोलन मोर्चे काढले.
    Maharashtra Politics: भाजपनं गियर बदलला, शहांच्या प्लानवर काम सुरु; फडणवीसांच्या दोन्ही DCMचे होमग्राऊंड रडारवर
    छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा महापौर असताना देखील आम्ही शहरातील नागरिकांना पाणी देऊ शकलो नाही याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळावर जाहीर माफी मागितली होती असा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी याचा पाठपुरावा केला त्यामुळे या योजनेला गती मिळाली होती. मात्र काही कारणांमुळे आमचं सरकार गेलं आणि एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीस यांचा सरकार आलं आहे. तीन वर्षे उलटूनही सरकार शहराला पाणी देऊ शकले नाही, असा अंबादास दानवे म्हणाले.

    छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये आमचे महापौर असताना आम्ही शहराला दोन किंवा तीन दिवस आड पाणीपुरवठा केला. आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधात असताना आम्हाला सत्ता द्या आम्ही सहा महिन्यात पाणी देऊन म्हणाले होते. नंतर पुन्हा मोर्चा काढून आम्ही तीन महिन्यात पाणी देऊ असं सांगितलं. आता सरकार मध्ये येऊन तीन वर्षे झाली मात्र आणि त्यापैकी शहराला पाणीपुरवठा होत नाही. यामुळे आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लबाडांनो शहरवासीयांना पाणी द्या हे आंदोलन पुकारला आहे असं विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले.

    या आंदोलनाची माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी दानवे खैरे यांच्या सुरू असलेल्या वादावर प्रश्न विचारला. खैरेंनी तुमच्यावर आरोप केले, मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तुमचे वाद मिटल्याचं समजलं. मात्र आज पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत खैरे गैरहजर दिसत आहेत असा प्रश्न विचारला. पत्रकाराने प्रश्न विचारतात अंबादास दानवे संतापले. पत्रकारांनी काड्या करू नये, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. चंद्रकांत खैरे यांनी आमच्यात वाद नाही असे सांगितले त्यामुळे कृपया काड्या करू नका. तुम्हाला बातम्या द्यायच्यात तर द्या नाहीतर देऊ नका. आमच्या पक्षातील वाद मिटवण्यासाठी आम्ही सक्षम असल्याचे दानवे म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed