• Thu. Mar 12th, 2026
    जोरदार धडक अन् गाडीसह २०० मीटर फरफटत नेलं, पती-पत्नीचा हादरवणारा अंत, रायगडमध्ये संताप

    Raigad Accident News: रायगडमध्ये एका इनोव्हा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर या इनोव्हाने दुचाकीला फरफटत नेलं. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. रायगडच्या अलिबाग येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

    Lipi

    अमुलकुमार जैन, रायगड: रायगड जिल्ह्यातील अलिबाग पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मानीफाटा येथे रेवस बाजूकडे जाणाऱ्या इनोव्हा कारने त्याच्या पुढे असणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली येथील विश्वास पाटील (वय ४७) व त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात इनोव्हा कारने मोटरसायकलला २०० मीटर फरफटत नेलं.

    इनोव्हाची दुचाकीला जोरदार धडक

    याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील खडताळ पूलपासून रेवस बाजूकडे जाणारी इनोव्हा कार क्रमांक एम एच ०२ डी जे ८१२१ ही भरधाव वेगात होती. सदर इनोव्हा वरील चालक हा त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन मानी फाटा नजिक असलेल्या मसाला मिल येथे आली असता पुढे जाणारी मोटर सायकलला जोरदार धडक दिली. धडकेत इनोव्हा कार चालकाने धडक दिलेली दुचाकी २०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेली.
    Nagpur News: माझा मित्र मला बोलावतोय… दोस्ताने आयुष्य संपवलं, विरह सहन होईना, दोन दिवसांनी सचिननेही तेच केलं

    संतप्त नागरिकांकडून इनोव्हाची तोडफोड

    या घटनेने परिसरातील नागरिक संतप्त झाले, त्यांनी दुचाकीला धडक दिलेल्या इनोव्हा कारची तोडफोड करत काही काळ वाहतूक रोखून धरली असल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी इनोव्हा कारचालकाला ताब्यात घेतलं असून जमावाला देखील शांत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातातील जखमी पती पत्नी यांना जिल्हा रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाटील दाम्पत्य अलिबागहून रेवसकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती आहे.

    सदर अपघाताची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र घटनास्थळी जमाव संतप्त झाला असल्याने अलिबाग पोलिसांनी अधिक फौजफाटा मागवून जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

    अलिबाग रेवस या रस्त्यावर गेल्या चार महिन्यात पंचवीसहून अधिक अपघात झाले असून चार-पाच जणांनी नाहक जीव गमावला आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरण होणे हे गरजेचे आहे, असं मत अलिबाग नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिल चोपडा यांनी व्यक्त केलं.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed