Sanjay Raut Marathi News : संजय राऊतांनी शिंदे गटावर जोरदार टीका करत अमित शहांनी त्यांना फडणवीसांची चाकरी करण्याचे फर्मान सोडल्याचा आरोप केला आहे, अन्यथा सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा दावा त्यांनी केला. मुंबईत मराठी कुटुंबांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा मुद्दाही त्यांनी उचलला असून, यासंदर्भात अमित शहांकडे तक्रार करणार असल्याचे राऊत म्हणाले.
अमित शाहांनी त्यांना तंबी दिली आहे की, फडणवीसांची चाकरी करा नाहीतर सरकारमधून दूर राहा, तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहित आहे त्यांच्या काय चर्चा असतात फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे खातपीती घरं सोडून बाहेर कसे निघतील. त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलं आहे, आपण इथेच राहूया, चाकरी करू, भांडी घासू, गुलामी कर पण आता बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे आनंद दिघे शिकवू नये आणि बाळासाहेब ठाकरे सांगू नये, असं म्हणत संजय राऊतांनी देसाईंसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
मुंबईमध्ये मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना समोर आली होती. घाटकोपर येखील एक सोसायटीमध्ये मांसाहार करतात म्हणून त्यांना मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटण खाते हो, असं म्हणत त्यांना अपमानित केलं गेलं. यावरही राऊतांनी भाष्य केलं आहे. या संदर्भात एसंशिं पक्षाचे प्रमुख अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार आहोत. आरएसएसचे भैय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथे जात घाटकोपर हे गुजरात्यांचं आहे. हे काय आहे, कसं आहे? आम्ही नक्कीच अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना कळवू. कारण त्यांना संपूर्ण मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे, त्याला भाजपसोबतच्या सर्व पक्षांचं मुक समर्थन असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

