• Fri. Mar 6th, 2026
    मित्राला मदत केली, पण मुलीच्या लग्नाला पैसे कमी पडले; परत करण्यास नकार, वृद्ध बापाने उचललं टोकाचं पाऊल

    Chh. Sambhajinagar News : शहरातील एका वृद्धाने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले १५ लाख रुपये जीवलग मित्राला घर बांधण्यासाठी दिले. नुकताच १८ एप्रिलला मुलीचं लग्न ठरलं होतं. पण मित्राने पैसे न परतवल्याने नैराश्यात गेलेल्या वृद्धाने टोकाचं पाऊल उचललं आहे.

    Lipi

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका वृद्धाने मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले १५ लाख रुपये जीवलग मित्राला घर बांधण्यासाठी दिले. नुकताच १८ एप्रिलला मुलीचं लग्न ठरलं होतं. लग्नासाठी पैसे लागत असल्याने वेळोवेळी मागून सुद्धा परतवले नव्हते. पैशांसाठी त्यांनी मुक्कामी देखील थांबावे लागले होते, तरी मित्राने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे नैराश्यात गेलेल्या मुलीच्या बापाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वृद्धाच्या मित्राविरुद्ध सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    माधव गोविंदराव राऊत रा.सिसारखेडा असे आरोपी मित्राचे नाव आहे. तर सर्जेराव साळवे रा.वांगी बुद्रुक ता.सिल्लोड असे मृत वृद्धाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, माधवराव राऊत आणि सर्जेराव साळवे हे दोघे जीवलग मित्र आहे. दरम्यान ८ महिन्यांपूर्वी सर्जेराव यांचे मित्र माधव यांच्या घराचे काम सुरू होते. माधवराव यांना घराचं बांधकाम करण्यासाठी पैसे कमी पडत होते. यावेळी सर्जेराव साळवे यांनी माधव राऊत यांना १५ लाख रुपये देतो म्हणून सांगितले. मात्र माझ्या मुलीचं लग्न ठरल्यास मला पैसे परत द्या, अशी अट घालण्यात आली.
    कुटुंबाला खर्च नको! पत्नीला संपवून स्वत:ही आयुष्याची दोर कापली; चिठ्ठी वाचून कुटुंबाला हादरा
    आठ महिन्यानंतर १८ एप्रिलला सर्जेराव साळवे यांच्या मुलीचं लग्न ठरलं. याबाबत सर्जेराव यांनी माधव राऊत याला पूर्व कल्पना देऊन पैसे मागितले होते. मात्र वेळोवेळी पैशांची मागणी करूनही माधव यांनी पैसे परत केले नाहीत. लग्न तोंडावर असल्याने साळवे यांची चिंता वाढत चालली होती. १२ एप्रिलला सर्जेराव साळवे हे माधव यांच्या घरी गेले. पैशांसाठी त्यांनी मुक्काम केला. यावेळी मुक्कामी थांबलेल्या सर्जेराव यांना माधवराव याने अपमानास्पद वागणूक दिली.

    कष्टाने कमवलेले पैसे मित्राला मदत म्हणून दिले मात्र लग्न तोंडावर असताना पैसे देण्यास नकार मिळाला. यामुळे मुलीचे लग्न करायचं कसं? असा प्रश्न सर्जेराव यांना सतावत होता. याच नैराश्यातून सर्जेराव यांनी १३ एप्रिलला घराजवळ असलेल्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.

    दरम्यान, लग्नाच्या तोंडावर वर बापाने गळफास घेऊन आत्महत्या केली यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीयांनी घरात टाहो फोडला. मात्र सर्जेराव यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकलं नव्हतं. अखेर सर्जेराव यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलं. जीवलग मित्रानेच ऐनवेळी धोका दिल्याने त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी सर्जेराव यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून माधव राऊत यांच्याविरुद्ध सिल्लोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लहुजी घोडे करीत आहेत.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed