• Tue. Apr 22nd, 2025 3:09:59 AM
    ठाण्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीवर बंदी, मनसेचं खळळ्…खट्याक, शिक्षण विभागाचीही कारवाई

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 16 Apr 2025, 1:03 pm

    Marathi Language in Schools: ठाण्यातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात आणि शाळेच्या Campus मध्ये फक्त इंग्रजी बोलण्याचे निर्देश दिले होते. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी बोलल्याबद्दल अपमानित केले जात असल्याची तक्रार मनसेने केली होती. ठाणे जिल्हा परिषदेने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली. परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, सर्व शाळांनी मराठी भाषेचा वापर आणि आदर राखणे जरुरीच आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    ठाणे: महाराष्ट्रातच पुन्हा एकदा मराठी भाषेची गळचेपी होत असल्याची घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी बोलण्याबाबतच्या वादावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली आहे . जिल्ह्यातील अनेक सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात मराठीऐवजी इंग्रजी बोलण्याचा दबाव आणला होता. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेकडे याबाबत तक्रार केली होती. मंगळवारी (१५ एप्रिल) शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलण्यापासून रोखल्यास कारवाई करण्याचा इशारा परिषदेने दिला.

    ‘फक्त इंग्रजी’ कारवाई नक्की

    ठाण्यातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांना वर्गात आणि शाळेच्या Campus मध्ये फक्त इंग्रजी बोलण्याचे निर्देश दिले होते. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी बोलल्याबद्दल अपमानित केले जात असल्याची तक्रार मनसेने केली होती. ठाणे जिल्हा परिषदेने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली. परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, सर्व शाळांनी मराठी भाषेचा वापर आणि आदर राखणे जरुरीच आहे. जर कोणत्याही शाळेने फक्त इंग्रजी बोलण्याचे धोरण राबवले तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, १३ डिसेंबर २०२३ च्या सरकारी आदेशानुसार महाराषट्रातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे.

    संभाषणात मराठीचा वापर आवश्यक

    आदेशात असेही म्हटले आहे की मराठी भाषेचा वापर केवळ भाषेच्या तासातच करू नये. त्याऐवजी, ते दैनंदिन संभाषणांमध्ये, वर्गातील चर्चांमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, नाटकांमध्ये आणि भाषण स्पर्धांमध्ये वापरले गेले पाहिजे. शिक्षण विभागाच्या या आदेशाचे मनसेने स्वागत केले आणि शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या भाषिक असमतोलाला रोखण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल असल्याचे म्हटले. महाराषट्र नवनिर्माण सेनेने म्हटले आहे की, वैयक्तिक आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जतनासाठी मातृभाषेवर अटळ राहणे महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये मराठीला बाजूला ठेवणे मनसे खपवून घेणार नाही.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed