Unseasonal Rain Crop Loss: द्राक्ष हंगामाच्या शेवटी आणखी थोडा अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवरच ‘पाणी’ फेरले. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले
हायलाइट्स:
- द्राक्ष, कांदा, गहू पिकांचे नुकसान
- द्राक्षांची काढणी सुरू असतानाच तडाखा
- चांगला दर मिळण्याच्या अपेक्षेवर पाणी
येवल्यात सलग दुसऱ्या दिवशी हजेरी
येवला : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सध्या उन्हाळ कांदा कढणीला आला असून, काही ठिकाणी कांदा काढणीचे कामही सुरू आहे. अचानक झालेल्या अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली, तर या पावसाने कांद्यासह इतर पिकांचेही नुकसान झाले. रविवारी, (दि. १३) दुपारी दोन वाजेच्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर, ममदापूर, खिर्डीसाठे, पन्हाळसाठे परिसरात गारांसह अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी काढलेला कांदा भिजला. तर काढणीला आलेल्या कांद्याच्या पातीत पाणी शिरल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. दरम्यान, शनिवारी (दि. १२) सायंकाळी नांदूर, सुकी, बाभूळगाव परिसरात गारांचा पाऊस झाला, तर येवला शहरासह कोटमगाव, धामोडे, भाटगाव, अंदरसूल, धुळगाव, अंतरवेली, सावरगाव परिसरातही पाऊस झाला. येवल्यातील हिंदुस्तानी मशिदीच्या मिनारवर वीज कोसळल्याने मिनारच्या काही भागाचे नुकसान झाले.
जळगावात केळी बागांचे नुकसान
जळगाव : जिल्ह्यात रविवारी (दि. १३) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसासह गारपीटने झोडपून काढले. रावेर, चोपडा, यावल व जळगाव तालुक्यातील बहतांश भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. चोपडा व यावल तालुक्यातील धानोरा हरिपुरा या गावात काहीवेळ गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे दोन दिवसात १ हजार हेक्टरवरील दादर, बाजरी, मका व केळी पिकांचे नुकसान झाले