• Wed. Apr 16th, 2025 12:50:13 PM
    शिरसाटांचा कार्यक्रमाला लेटमार्क; मंत्री सावे संतापले, ‘खैरे नका होऊ’ म्हणत सुनावले

    Atul Save on Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळते. अतुल सावेंनी शिरसाट यांना ‘खैरे नका होऊ, खैरे नका होऊ, खैरेंसारखं करू नका, आता लोकांनी खैरेंना मग… शब्द तोंडात ठेवत टोला लगावला आहे.

    Lipi

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते महानगरपालिकेतर्फे विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या नियोजित कार्यक्रमाची वेळ अकरा वाजताची असल्याने सर्व मान्यवर पोहोचले होते. मात्र ज्यांच्या हस्ते उद्घाटन ते मंत्री संजय शिरसाट तब्बल दीड तास लोटूनही पोहचले नाहीत. यावेळी ताटकळत बसलेल्या मंत्री अतुल सावे यांनी मंत्री शिरसाट यांना कॉल करून अस नका करू यार लोकांना, खैरे नका होऊ, खैरे नका होऊ, खैरेंसारखं करू नका, आता लोकांनी खैरेंना मग… शब्द तोंडात ठेवत मंत्री अतुल सावेंनी संजय शिरसाट यांना चिमटा काढला आहे. दोघांमधील संवाद मोबाईल कॅमेरात कैद झाला आहे.

    सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमधील मंत्री आमदार खासदार यांनी उद्घाटन भूमिपूजनांचा धडाका लावला आहे. यामध्ये सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांचा देखील समावेश आहे. पालकमंत्री असल्याने अनेक ठिकाणी संजय शिरसाट यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण असतं. मात्र अनेकवेळा संजय शिरसाट कार्यक्रमांना पोहोचतात मात्र त्यांना उशीर झालेला असतो. यामुळे अनेक ठिकाणी मान्यवर व नागरिकांना ताटकळत बसावं लागतं. याबाबत अनेक नेते तक्रार देखील करतात.
    स्नेहभोजन, मग Amit Shah यांची शिंदे-फडणवीसांसोबच रात्री उशिरा बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडतंय?
    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी विविध कामांचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्याचे योजिले होते. यासाठी नियोजित कार्यक्रमाची वेळ सकाळी ११ वाजताची होती. कार्यक्रमाच्या वेळेनुसार सर्व मान्यवर कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यात मंत्री अतुल सावे देखील होते. तब्बल दीड तास होऊन मंत्री संजय शिरसाठ आलेच नाही. तब्बल दीड तास वाट बघितल्यानंतर कार्यक्रमाच्या गेटवर आले. सावेंनी मनपा आयुक्त जी श्रीकांत त्यांच्या फोनवरून संजय शिरसाट यांना कॉल केला. यावेळी सावे म्हणाले, असं नका करू यार लोकांना, खैरे नका होऊ, खैरे नका होऊ, खैरेंसारख करू नका आता लोकांनी खैरेंना मग…शब्द तोंडात ठेवत मंत्री अतुल सावेंनी संजय शिरसाठ यांना चिमटा काढला.दोघांमधील संवाद मोबाईल कॅमेरात कैद झाला.

    मंत्री संजय शिरसाट मंत्री अतुल सावे यांच्यातील हा कलगीतुरा वाढत गेला. शेवटी महानगरपालिकेच्या कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं. मात्र याच महापालिका आयुक्तांच्या बदलीवरून या दोन्ही मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली होती.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed