• Thu. Sep 10th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

आयसीयू बंद असल्याने शताब्दीत रुग्णाचा मृत्यू, कुटुंबियांचा आरोप

आरोग्य सुविधेचा मोठा प्रश्न सध्या राज्यात उपस्थित झाला आहे. मुंबईत योग्य सुविधा नसल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. चेंबूरमधील रहिवाशी अविनाश शिरगावकर (४५) यांना सोमवारी सकाळपासून मूत्रविसर्जनास त्रास होत होता. कुटुंबीयांनी त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयामध्ये नेले. मात्र अतिदक्षता विभाग बंद असून तज्ज्ञ डॉक्टरही नसल्याचे सांगण्यात आले. कुटुंबियांनी विनंती केली की, त्यांना खूप त्रास होत असल्याने नळीद्वारे लघवी काढल्यास त्यांना थोडा आराम मिळेल, त्यानंतर त्यांना दुसरीकडे हलवता येईल, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अविनाश यांना पुढे ‘राजावाडी’मध्ये नेण्यात आले, तिथे ईसीजी काढून, गोळ्या देऊन घरी पाठवण्यात आले. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत त्रास वाढल्याने, त्यांना शीव येथील लो. टिळक रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र उपचार सुरू केल्यानंतर काही तासांत त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed