• Fri. Mar 13th, 2026

    तळकोकणात प्रवासाची चिंता सोडा, ‘येताव’ ॲपवर रिक्षा सेवेत; फक्त डाऊनलोड करायचं आणि…

    तळकोकणात प्रवासाची चिंता सोडा, ‘येताव’ ॲपवर रिक्षा सेवेत; फक्त डाऊनलोड करायचं आणि…

    Edited byअनिश बेंद्रे | Authored by प्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 10 Apr 2025, 8:43 am

    Sindhudurg Rickshaw Yetav App : या ॲपद्वारे आत्तापर्यंत २०० ते २५० रिक्षा चालकांनी नोंदणी केली आहे. मालवणमध्ये दोन दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते ॲपचे लोकार्पण करण्यात आले

    महाराष्ट्र टाइम्स

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : तळकोकणात फिरण्याचा विचार असाल, तर तुमची प्रवासाची चिंता आता मिटणार आहे. तुम्ही ट्रेन किंवा एसटी बसने मालवण, कुडाळ, देवगड येथे उतरल्यावर आता तुम्हाला प्रवासासाठी रिक्षा शोधत बसण्याची आवश्यकता नाही. ‘येताव’ या ॲपद्वारे रिक्षा तुमच्या सेवेत हजर असेल.

    ही अभिनव संकल्पना असलेल्या ॲपचा उपयोग पर्यटकांनाच नव्हे, तर स्थानिकांनाही होणार आहे. याच संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे नितीन वाळके यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.

    या ॲपद्वारे आत्तापर्यंत २०० ते २५० रिक्षा चालकांनी नोंदणी केली आहे. मालवणमध्ये दोन दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते ॲपचे लोकार्पण करण्यात आले. तसेच बुधवारी देवगड येथेही या ॲपचा लोकार्पण सोहळा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

    हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणाहून रिक्षा हवी आहे त्या परिसरात जे रिक्षाचालक उपलब्ध असतील त्या सर्वांचे नंबर उपलब्ध होतील. अन्य वाहनचालकांनी ॲपवर नोंदणी केल्यास त्यांचेही नंबर इच्छुक प्रवाशांसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती नितीन वाळके यांनी दिली.

    Wardha Accident : चला येतो लवकरच; निरोप घेऊन वैद्य कुटुंब निघालं ते कायमचंच, अपघातात चौघंही ठार, गावाच्या डोळ्याची धार थांबेना
    ही सेवा सिंधुदुर्गातील इतर तालुक्यांसाठी उपलब्ध होणार आहे. पर्यटकांना व प्रवाशांना याचा फायदा होत असल्याची प्रतिक्रिया मालवण येथील पर्यटन व्यावसायिक विशाल गोवेकर व संगीता जोशी यांनी दिली.

    पुण्यात रिक्षा-वाद वाढले

    दुसरीकडे, पुण्यात मात्र ॲपवरून रिक्षा सेवा देणाऱ्या ‘उबर’ कंपनीने बुकिंगनंतर प्रवाशांकडून मीटरप्रमाणेच पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना भाड्याचे पैसे थेट रिक्षा चालकांना द्यावे लागणार आहेत; परंतु रिक्षा चालकांनी यासंबंधी माहिती बसतानाच प्रवाशांना देणे अनिवार्य आहे. मात्र यावरून वादावादीचे प्रसंगही घडताना दिसत आहेत.
    Solapur Student Death : घरातल्या जिन्यात खेळता खेळता आक्रित, नववीतील राजनंदिनीचा तडफडून मृत्यू, सोलापुरात हळहळ
    उबर कंपनीने रिक्षा चालकांसोबत करार केलेला आहे. ‘उबर ही सॉफ्टवेअर आधारित सेवा देणारी कंपनी असल्याने रिक्षा चालक आणि प्रवाशांनी भाडे ठरवावे’ असे या करारात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे उबरवर रिक्षा चालवणाऱ्यांनी मीटरप्रमाणे भाडे घेण्यास सुरुवात केल्याने पुन्हा वादावादीचे प्रसंग उद्भवताना पाहायला मिळत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed