• Fri. Mar 20th, 2026
    ‘कुठे जाताय?…’; चंद्रकांत खैरेंच्या नाराजीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंचं विधान

    Uddhav Thackeray on Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील त्यांच्या निर्धार शिबिरात कुठे जाताय असा सवाल करत त्यावर भाष्य केलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये निर्धार मेळावा घेतला. मुंबईतील शिबिरानंतर मुंबई बाहेर हा पहिला निर्धार मेळावा नाशिकमध्ये पार पडला. संघटनात्मक बांधणी आणि ताकद वाढवण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये घेतलेल्या निर्धार मेळाव्यात महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवरुन टीका केली.

    नाशिकमध्ये ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. तसंच नुकत्याच चंद्रकांत खैरे नाराज असल्याच्या चर्चांवरही त्यांनी भाष्य केलं.
    Uddhav Thackeray : ‘शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा’, उद्धव ठाकरेंची मागणी

    चंद्रकांत खैरेंबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

    ‘निवडणुकांमध्ये हार, जीत होत असते, त्यातून खचून जाणारा लढू शकत नाही. लढायचं असेल, पाण्यात उडी मारायची असेल, पैर तीर गाठायचा असेल तर नाका-तोंडात पाणी जाईल. पण हिंमत असेल तर उडी मार आणि नसेल तर पंचा गुंडाळ आणि परत जा. रणांगणात उडी मारायची असेल तर काय होई त्याची पर्वा न करता उडी मारायला शिकलं पाहिजे. तुम्ही या काळातही शिवसेनेचं काम करता, हार-जीत हा एक विषय झाला, परंतु आपण काम कशासाठी करतोय हे ठरवलं पाहिजे. आताही अनेक जुने कार्यकर्ते आहेत. अगदी चंद्रकांत खैरे सुद्धा. काल बातमी आली खैरे साहेब नाराज.. चालले… जा कुठे जाताय, जाताय?’, असा सवाल त्यांनी खैरेंकडे पाहत केला.

    तसंच पुढे बोलताना त्यांनी ‘ते जाऊच शकत नाही ही माणसं. पण एक वाक्य घ्यायचं आणि त्याचा पराचा कावळा करायचा. सगळे माझ्या सोबत आहेत आणि माझ्यासोबतच राहणार आहेत’, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
    MLA Sandip Joshi : विजय वडेट्टीवार यांच्या परिवाराने अधिक दान केल्याचे सांगावे, जाहीर माफी मागू; आमदाराचे आव्हान

    ‘महाराष्ट्राची दिशा आपण ठरवणार हे गद्दार नाही…’

    निर्धार सभेत राज्यातील विविध मुद्यांवरुन शिंदे गटावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. भाषणाच्या सुरुवातीला ते म्हणाले, ‘मी भाग्यवान आहे मला मां आणि बाळासाहेबांसारखे आई-वडील लाभले. त्यांनी माझ्या पाठीमागे तुमच्यासारखी पुण्याई उभी करुन ठेवली आहे, याच्यासारखं भाग्य लाभलं. हे सत्तेपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. सत्ता असली की सगळे तिकडे जातात ही जगराठी आहे, पण सत्ता नसताना जे राहतात तो खरा निष्ठावान आणि तो खरा आपला सोबती असतो. सत्यनारायणाची पूजा असली, की सगले तिर्थप्रसादाला जातात, तसेच सगळे जातात, तर जाऊद्या. पण काही तुमच्यासारखे खरोखर वाघाचे छावे म्हणू असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार माझ्यासोबत आहेत त्याचा अभिमान आहे.’

    Uddhav Thackeray : ‘कुठे जाताय?…’; चंद्रकांत खैरेंच्या नाराजीच्या चर्चांवर उद्धव ठाकरेंचं विधान

    ‘उन्हाळा तापला आहे, महाराष्ट्र खूप गरम झाला आहे, रेकॉर्डब्रेक…. शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आठवतं, ज्यावेळी उन्हात सभा होयच्या त्यावेळी ते म्हणायचे, जमीन तापली आहे, वरुन सूर्य आग ओकतो आहे. पण मधली तुमची डोकी केवळ उन्हाने नाही तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तापली आहेत, की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विचाराने किती तापला आहात हे महत्त्वाचं आहे. त्यावर भविष्य, महाराष्ट्राची दिशा ठरवणार. ही दिशा आपण ठरवणार, हे गद्दार नाही ठरवणार’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed