• Thu. Mar 12th, 2026
    ‘आपले सरकार’ आजपासून सुट्टीवर, पाच दिवस सुविधा मिळणार नाही, नेमकं कारण काय?

    नागरिकांना पारदर्शक व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणारे ‘आपले सरकार’ हे पोर्टल पुढील पाच दिवस बंद राहणार आहे. लोकांना शासनाच्या विविध सेवा पारदर्शक पद्धतीने व जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, कामकाज कार्यक्षम व्हावे, या हेतूने शासनाने आपले सरकार हे ऑनलाईन पोर्टल दहा वर्षांपूर्वी सुरु केले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: नागरिकांना पारदर्शक व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणारे ‘आपले सरकार’ हे पोर्टल पुढील पाच दिवस बंद राहणार आहे. या पोर्टलचे अद्ययावतीकरण सुरू आहे. त्यामुळे कोणतेही शासकीय ऑनलाईन काम १४ एप्रिलपर्यंत या पोर्टलद्वारे होऊ शकणार नाही. याबाबत नोंद घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

    लोकांना शासनाच्या विविध सेवा पारदर्शक पद्धतीने व जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, कामकाज कार्यक्षम व्हावे, या हेतूने शासनाने आपले सरकार हे ऑनलाईन पोर्टल दहा वर्षांपूर्वी सुरु केले. या पोर्टलद्वारे जलदगतीने सेवा मिळतात. विशिष्ट प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नेहमी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, ओळख पुरावा, नरेगा जॉब कार्ड, बपॅनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र यासह इतरही आवश्यक कागदपत्रे या द्वारे काढता येतात.

    शेती, पशुसंवर्धन, सहकार, वित्त विभाग, वन्य विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, गृह विभाग, उद्योग आणि कामगार अशा कितीतरी विषयाशी संबंधित सेवा आपले सरकार या पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यासाठी शासकीय संबंधित कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही. असंख्य नागरिक, प्रामुख्याने सर्वच युवावर्ग या ऑनलाइन सेवेचा प्रभावी वापर करताना दिसून येतो.

    आपले सरकार पोर्टल राज्यात प्रचंड लोकप्रिय झाले असून त्याचा वापरही प्रचंड वाढला आहे. हे पोर्टल अद्ययावत करण्याची गरज असून नियमित देखभाल सुद्धा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच दिवस या पोर्टलची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून दहा ते १४ एप्रिल असे पाच दिवस हे पोर्टल बंद राहील असे या पोर्टलचे संचालक महाआयटी या विभागाने कळविले आहे.

    तब्बल १६ कोटी अर्ज निकाली काढण्यात आले
    ३८ विभागांच्या ४८५ सेवा वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. नागरिकांना या सेवा घरबसल्या मिळवता येत आहेत. २०१५ पासून आपले सरकार डिजिटल प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत एकूण १७ कोटी ६३ लाख ६२ हजार ४६८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १६ कोटी ६१ लाख ३ हजार ९०९ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १ कोटी ६६ लाख २३ हजार २७५ अर्ज आले होते.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed