• Fri. Mar 6th, 2026
    चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरेंचं काम; नारायण राणेंची जहरी टीका

    Authored byमानसी देवकर | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Apr 2025, 5:20 pm

    रामनवमीच्या निमित्ताने भाजप खासदार नारायण राणे साई दरबारी आले होते. नारायण राणे यांनी सहकुटूंब शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतलं. रामनवमी आणि भाजपचा स्थापना दिवसही असल्याने शिर्डीत आल्याचे राणेंनी सांगितले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची दिशा दाखवली, असे ते म्हणाले. यावेळी राणेंनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. चांगल्या कामात व्यत्यय आणणं हे उद्धव ठाकरेंचं काम असल्याची टीका राणेंनी केली. पुढील निवडणुकीपर्यंत ठाकरेंचा पक्ष राहणार नाही, असं विधानही त्यांनी केलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed