• Sat. Apr 12th, 2025 9:24:37 PM

    Raigad News : व्हाट्सअपला स्टेटसला औरंगजेबाचा शाही फोटो, शिवभक्तांकडून संताप , काही वेळातच… अलिबागमधील घटना

    Raigad News : व्हाट्सअपला स्टेटसला औरंगजेबाचा शाही फोटो, शिवभक्तांकडून संताप ,  काही वेळातच… अलिबागमधील घटना

    Raigad Crime News रायगडमध्ये व्हॉट्सअप स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर ठेवणाऱ्या तरुणाविरोधात कारवाई झाली आहे. शोएब नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा स्टेटस समाजात जातीय तणाव वाढवणारा असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमुलकुमार जैन, अलिबाग : राज्यात गेल्या काही दिवसांमागे औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण पेटलं होतं. विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. नागपूरमध्ये यावरून मोठी हिंसा झाली होती. आता कुठे हे प्रकरण शांत झालं असताना रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्हॉटसअपच्या स्टेटसवर औरंगजेब याचा फोटो व मजकूर ठेवला होता. या तरूणाला चांगलंच महागात पडलं आहे.
    शोएब या तरूणाने ३ एप्रिलला दुपारी १२.२७ च्या वाजण्याच्या सुमारास औरंगजेब याचा फोटो आणि त्याखाली आक्षेपाह ‘ असा मजकूर असलेला स्टेटस आपल्या व्हॉटस अपवर ठेवला होता. तो फोटो आणि मजकूर बघितल्यानंतर समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जातील याची जाणीव असताना व भारत देशात औरगंजेब याचे कोणते ही चांगले कार्य नसताना, त्याचे उदात्तीकरण व्हावे या उद्देशाने आरोपीने हे स्टेटस ठेवले आहे. ते पाहून हिंदु समाजाच्या भावना दुखावून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल म्हणून, सार्वजनिक शांतता बिघडवण्याचे हेतूने व्हॉटसअप स्टेटसला वरील पोस्ट प्रसारित झाला असल्याची माहिती तळा पोलिस ठाण्याचे प्रभारी सतीश गवई यांना समजताच आरोपीविरुद्ध तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी हा सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे.

    याबाबत अधिक माहिती देताना तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी सांगितले की, तळा शहरातील खालचा मोहल्ला येथील शोएब नौशाद खाचे याने त्याच्या व्हॉट्सप मोबाईल स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो लावून दुपारी १२.२७ च्या सुमारास हिंदु आणि मुस्लीम समाजात जातीय तणाव निर्माण होईल असे स्टेटस ठेवले होते. इंग्रजीमध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहून जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट शेअर केली होती.

    नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर समाजाच्या हितासाठी आणि सामाजिक एकोपा बंधुभाव रहावा यासाठी करावा. सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे सामाजिक शांतता बिघडत आहे. नागरिकांनी त्यांना आलेल्या संदेशावर, अफवांवर विश्वास ठेवू नये सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मीडियावर वापरू नये असे आवाहन माणगाव रायगडचे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी केले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed