मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठीच चालणार, नाही तर कानाखाली आवाज येईल…असं म्हणत राज ठाकरे यांनी गुडीपाढवा मेळाव्यात गर्जना केली होती. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी विविध बँका, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन..तिथल्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलावं अशी…सक्ती करण्याचं निवेदन दिलं जात आहे. तर काही ठिकाणी आक्रमक देखील झाल्याचं दिसतंय. अशातच याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी..आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रक काढून मनसैनिकांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलंय.दरम्यान या सगळ्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे.