राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सडकून टीका केली. संजय काकडे यांनी काँग्रेसला माफी मागण्यासाठी 48 तासांचा वेळ दिला आहे. माफी मागितली नाही तर काँग्रेस नेत्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच संजय काकडे यांनी शरद पवारांना देखील काँग्रेसपासून दूर जाण्याचं आवाहन केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : काँग्रेसने सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटलं आहे. काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर करण्यात आलेल्या या टीकेचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समर्थन केलं आहे. तसेच सुनेत्रा पवार यांनी गुंगी गुडिया म्हटलेलं चुकीचं असेल तर दुर्गा असल्याचं सिद्ध करुन दाखवावं, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. त्यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी या टीकेवरुन ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.
संजय काकडे यांनी पवारांना नेमकं काय आवाहन केलं?
“जर काँग्रेसने आपल्या प्रदेशाध्यक्षांना काढलं नाही किंवा माफी मागितली नाही तर मी ज्येष्ठ नेते शरद पवारांना विनंती करेन की, आघाडीतून बाहेर पडावं. काँग्रेस सोडा. काँग्रेस कोणत्या स्तरावर जात आहे ते पाहा. तुमच्या घरातील एका सुनेला असं बोलत असतील तर शरद पवारांनी काहीही करुन काँग्रेस पक्षापासून लांब जावं. तुमच्या सुनेला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष एवढं घाणेरडं बोलत आहे, उद्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही हे लोकं असं काहीतरी बोलतील. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेस पासून लांब राहावं”, असं आवाहन संजय काकडे यांनी केलं आहे.
संजय काकडे यांचा हर्षवर्धन सपकाळेंवर घणाघात
“महाराष्ट्र काँग्रेसची घाणेरडी वृत्ती दिसून आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षाने याला दुजोरा देणं म्हणजे निर्लज्जपणा आहे. सगळ्यात घाणेरडी वृत्ती या लोकांची झाली आहे. ह्यांना आया-बहिणी नाहीत. या लोकांना लाज राहिली नाही. दुर्दैवाने एक स्त्री अशा संकटाशी सामना करत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्यासाठीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वत:ला वाहून दिलं आहे”, असं संजय काकडे म्हणाले.
“मला नैतिकतेने पटत नाही. पण या घाणेरड्या अध्यक्षांच्या वक्तव्यामुळे असं वाटतं की, जेव्हा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी गेले तेव्हा तुमची गुडिया लापता झाली होती का? असं म्हटलं तर ते किती घाणेरडे वाटेल? आम्हालाही असं बोलायला लाज वाटते. तेवढी अक्कल पाहिजे. एका स्त्रीबद्दल बोलताना महाराष्ट्राची संस्कृती विसरला का तू?”, असा घणाघात संजय काकडे यांनी केला.
‘काँग्रेस नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही’
“माझं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आवाहन आहे की, हर्षवर्धन सपकाळ यांचा तातडीने राजीनामा घ्या. नाहीतर माफी मागायला लावा. अन्यथा आम्ही कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. आम्ही काँग्रेसच्या नेत्यांसमोर निदर्शने देऊन त्यांच्या तोंडाला काळे फासू”, अशा इशारा संजय काकडे यांनी दिला.
“माझे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, हर्षवर्धन सपकाळ जिथे दिसेल तिथे त्याच्या तोंडाला काळे फासा. आम्ही काँग्रेसला माफी मागण्यासाठी 24 तासांची वेळ देतो”, असा इशारादेखील संजय काकडे यांनी दिला. “महिलांवर अशा पद्धतीने बोलणं हे काँग्रेसच्या संस्कृतीत नव्हतं. पण या अध्यक्षाला काँग्रेस संपवायची आहे”, असा आरोप संजय काकडे यांनी केला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा