Ratnagiri Accident News : ट्रकने दुचाकीस्वाराला तब्बल 400 फूट फरफटत नेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला आहे.
या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला आहे. ट्रकने दुचाकीस्वाराला तब्बल 400 फूट फरफटत नेल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पण ट्रक चालकाने बेदरकारपणे गाडी चालवल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
Anjali Damania यांचा नवा बॉम्ब, ‘पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्याकडे आले’
या अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. ट्रक जळत असताना धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांनी परिस्थिती आणखीच गंभीर बनली. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन योग्यरित्या परिस्थिती हाताळली वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी या घटनेतील अपघातग्रस्त नागरिकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
संशयित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. मृत तरुणाच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अकाली निधनाने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या परिसरातील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीसह अवजड वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी केली आहे.
