• Fri. Apr 25th, 2025 11:04:57 PM
    Sanjay Raut : राज ठाकरेंचा ‘त्या’ अटीवर भाजपला पाठिंबा, संजय राऊत म्हणाले, कानफटात आवाज काढायचा असेल तर…

    Sanjay Raut on Raj Thckaeray : मनसे नेते राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात शिवाजी पार्क मैदानावर बोलताना सत्ताधारी पक्षांवर टीका केली. राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी काम करण्याचं आश्वासन दिलं होतं. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना सरकारवर तिखट शब्दांत निशाणा साधला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मनसे नेते राज ठाकरेंची (Raj Thackeray) गुढी पाडव्याला आपल्या मेळाव्यामध्ये शिवाजी पार्क मैदानावर राजगर्जना झाली. यावेळी राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांवर टीक करत काही विषयांवर उघडपणे परखड भाष्य केलं. जर मराठी माणसाच्या चांगल्यासाठी काम करणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ असं मसने अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही.

    लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती, भाजपच्या सोईची होती. मराठी माणसासंदर्भात कानफटात आवाज काढायचा असेल तर काढायलाच पाहिजे. कोणत्या पक्षाचा नेता भूमिका मांडतोय त्याच्याविषयी आमच्या मनात कधीही संदेह असणार नाही. मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाचं संघटन भाजपने तोडलं हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा सर्वात मोठा हल्ला आहे. शिवसेना फोडण्यामागे नरेंद्र मोदी. अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात आहे. मुंबईवरती व्यापाऱ्यांचा ताबा राहावा यासाठी राजकारण झालं, राज ठाकरे त्यांना पाठिंबा देऊ इच्छितात त्यांच राजकारण आहे. आम्ही सगळे मराठी माणसाच्या प्रगतीसाठी काम करत आहोत. त्यामुळे त्यांना मदत होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
    राज ठाकरे म्हणाले औरंगजेबाची कबर राहूद्या, फडणवीस म्हणतात, काहीही झालं तरी…
    राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या प्रमुखाने एका मेळाव्यामध्ये केलेले भाषण आहे. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर विश्लेषण केले पाहिजे असं नाही. नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले, संघाने गुलमीच्या बेड्या तोडल्या हा शोध कोणी लावला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचं काय योगदान आहे याच्यावर सगळ्यांनी आमच्याकडून ब्रीफिंग घेतलं पाहिजे. १५० वर्षे देश गुलामांच्या बेडीत अडकला होता. महात्मा गांधींपासून पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, वीर बहाद्दर, सरदार पटेल, भगतसिंह आणि वीर सावरकर या सगळ्यांच्या नेतृत्त्वाखाली लढा झाला तेव्हा बेड्या तुटल्या. मोदी म्हणतात तो संघ कुठे नव्हता, लोकांसमोर खोटा इतिहास ठेवणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत देशाच्या जनतेची माणसिकत सुधारणार नाही. एखाद्या दिवशी वेड्यांचा खोटारड्यांचा देश म्हणून यादीमध्ये यायचा, असं म्हणत राऊतांनी कोपरखळी लगावली.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed