Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम31 Mar 2025, 11:44 am
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी अनेक मुद्यांवर भाष्य करत सरकारला घेरलं. औरंगजेबाच्या कंबरीचा वाद ते मराठी भाषेचा अवमान यावरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. मराठी माणसासाठी चांगल्या गोष्टी केल्यास फडणवीसांना पाठिंबा असेल असेही ते म्हणाले. यानंतर आज (३१ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरेंनी मांडलेल्या काही महत्त्वाच्या मुद्यांवर फडणवीसांनी उत्तर दिले.