नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी…सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकार येऊन आता महिने उलटले मात्र अद्याप कर्जमाफी झाली नाही. एवढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध योजनांचा खर्च आणि सरकार वरील…कर्जाचा बोजाकडे बोट दाखवत आता शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगितले. सरकारने कर्जमाफी वरून हात झटकल्याने फडणवीस-शिंदे-पवारांवर शेतकरी चांगलेच संतापले. आम्हाला कर्जमाफी नको शेतीमालाला भाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंबंधी छ. संभाजीनगरमधील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी…