ठाकरे यांच्या गटात सध्या लोकप्रतिनिधींची गळचेपी होत आहे. पक्षातील खासदार आणि आमदारांना नेतृत्वाकडून भेटीसाठी पुरेसा वेळ आणि महत्त्व दिले जात नाही. याच कारणास्तव लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी असून पक्षांतर्गत अस्वस्थता शिगेला पोहोचली आहे, असा दावा घोले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
Uday Samant: …तर राजीनामा देईन! गुणरत्न सदावर्तेंच्या आरोपावर उदय सामंत यांचा पलटवार, नेमकं काय म्हणाले?
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातून शिवसेना उबाठा पक्षाच्या अनेक नगरसेवकांना प्रत्येकी केवळ २५ लाख रुपये निधी मिळाला. तर सत्ताधारी भाजप-शिवसेनेतील नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष आणि विविध समिती अध्यक्षांच्या वाट्याला कोट्यावधीचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे आपल्या प्रभागात विकासकामे करणार कशी, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे, असा दावा घोले यांनी केला.
‘ संख्या ४५पर्यंत जाणार ‘
येत्या महापालिका अर्थसंकल्पाच्या आधी काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील. २० ते २५ नगरसेवक संपर्कात असून ही संख्या कालांतराने ४५ पर्यंतही जाईल, असा दावा अमेय घोले यांनी केला आहे.
Ayodhya Poul Patil : नागेशमामा, सोबत कोण आहेत सांगू का? ठाकरेसेनेने बंडखोर खासदारांना डिवचलं, तुमच्या ‘वर्मा’त हात घातल्यासारखे होईल!
‘राज्यात आता ऑपरेशन तुडवा’- राऊत
बंडखोर खासदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आणि त्यांच्या बंडखोरीवर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आता गद्दारांविरोधात ऑपरेशन तुडवा राज्यात ठिकठिकाणी सुरू होईल, असा जाहीर इशारा त्यांनी गुरुवारी दिल्लीत दिला. या लोकांना आम्ही सोडणार नाही व यांची गद्दारी जनतेसमोर मांडण्यासाठी आपण सभा घेऊ, असे शरद पवार यांनी आपल्याला सांगितले आहे, असेही राऊत म्हणाले. बंडखोर खासदार हे टायगर नव्हेत, तर भ्याड व पैशाने विकत घेतले गेलेले गद्दार आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. ‘तुम्ही आमच्या जिवावर, आमच्या पक्षावर आणि चिन्हावर निवडून आले आहात. जर तुमच्यात हिंमत असेल, तर तत्काळ राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा. यंदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि याच वर्षी या गद्दारांनी हे कृत्य केले आहे, असेही ते म्हणाले.
