Maharashtra Politics : ”नागेश मामा कोणाच्या घरी किती खोक्यात डील झाली हे महाराष्ट्राला सांगितले तर तुमच्या “वर्मा”त हात घातल्यासारखे होईल का?” असा बोचरा सवाल ठाकरे गटाच्या समर्थक अयोध्या पौळ पाटील यांनी विचारला
अयोध्या पोळ काय म्हणाल्या?
“नागेश मामा कोणाच्या घरी किती खोक्यात डील झाली हे महाराष्ट्राला सांगितले तर तुमच्या “वर्मा”त हात घातल्यासारखे होईल का? आणि होss सोबतचे कोण आहेत ते महाराष्ट्राला सांगु का?? गृहमंत्री देवाभाऊ तुमच्या गुप्तहेर खात्यास माझी काही मदत लागती तर नक्की कळवा..” अशी पोस्ट करत अयोध्या पौळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, ठाकरेंचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांना टॅग केलं आहे.
आष्टीकर यांच्या पुत्राची प्रतिक्रिया
नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार होते. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आष्टीकर पितापुत्रावर गंभीर आरोप केल्यानंतर, कृष्णा यांनी त्याला उत्तर दिलं आहे. “मतदान अंतिम टप्प्यात असताना सुषमा अंधारे यांनी लिहिलं की मला मतदान करू नये, मला मतदान करू नये म्हणजे कोणाला करा? सुषमा अंधारे नेहमी असंच काहीतरी बोलतात. म्हणूनच हे लोक असेच काही नाराज झाले असावेत, माझं उद्धव साहेब आणि मिलिंद नार्वेकर साहेबांसोबत देखील बोलणं झालेलं आहे. काँग्रेसने अधिकृत व्हीप बजावून मला मतदान करायला सांगितलं आहे. माझी मी भूमिका स्पष्ट केली आहे. मी आघाडीसोबत आहे, होतो आणि राहणार पण आहे. सुषमा अंधारेंना काय गडबड होती किंवा माझ्याबद्दल काय आकस होता देव जाणे, त्यांनी बोलायला पाहिजे होतं खासदार साहेबांबद्दल, परंतु माझ्याबद्दल बोलायला काही कारण नव्हतं. गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात आहेत आणि अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटात आहे. ते स्वीकार्य होऊ शकतं, तर कृष्णा पाटील आष्टीकर का होऊ शकत नाही?” असा सवाल त्यांनी विचारला.
Pune News : लग्नासाठी 14 कोटींचा महाल बूक, पण त्याआधीच आक्रित; होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर ट्रेकिंग, पुण्यातील तरुणाचा वेदनादायी शेवट
ठाकरेंच्या संसदीय पक्षाच्या बैठकीला सहा जण गैरहजर
दरम्यान, संविधान सदनाच्या तिसऱ्या मजल्यावरील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या दालनात झालेल्या बैठकीला लोकसभाध्यक्षांना पत्र देणारे अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे, तसेच संजय राऊत हे चौघेच उपस्थित होते. बंडखोरांमधील नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
‘या बंडखोरांना पक्षाशी गद्दारी करणे महागात पडेल. त्यांना मतदारसंघात फिरणे कठीण होईल’, असा इशारा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी दिला. त्याचबरोबर ‘संजय दिना पाटील व ओमराजे हे दोघेही शिवसेनेसोबत नाहीत’, असा दावा त्यांनी केला.
ठाकरेसेनेचा इशारा
‘या खासदारांची अनुपस्थिती ही पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन मानली जाईल आणि त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यासाठी कायदेशीर कारवाईचा विचार करू’, असे सांगत राऊत यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसाठी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगालाही जबाबदार धरले. ‘शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर गेली साडेतीन वर्षे निकाल न देणारे सर्वोच्च न्यायालय सध्या सुरू असलेल्या पक्षफोडीच्या प्रकारांचे पहिले अपराधी आहे’, असा आरोप त्यांनी पुन्हा केला.
हिंमत असेल तर आडवे या, संजय राऊतांवर बोचरी टीका; शिंदेंच्या खासदाराचा ठाकरेसेनेवर हल्लाबोल
लोकसभेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नऊ सदस्य आहेत आणि पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्रता टाळण्यासाठी, किमान सहा जणांना एकाच वेळी पक्ष बदलावा लागेल. पक्षाच्या सहा बंडखोर खासदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीनीकरणाची मागणी करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करून ते बिर्ला यांना सादर केले, तरी याबाबतची संसदीय प्रक्रिया क्लिष्ट असल्याने ती अद्याप पूर्ण झालेली नाही. अशा प्रकरणी पडताळणीसाठी लोकसभाध्यक्षांच्या कार्यालयाला काही खासदारांच्या वैयक्तिक उपस्थितीची आवश्यकता आहे, असे सांगितले जात आहे.
Uddhav Thackeray : ठाकरेंना पुन्हा झटका, BMC नगरसेवकांची संख्या घटली, किशोरी पेडणेकरांकडून सभागृहात विरोध, 6 महिन्यांच्या मुदतीची आठवण
ही प्रक्रिया योगदिनाच्या (२१ जून) नंतरच्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे समजते. संसदीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सध्या बंडखोर खासदारांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र ‘बंडखोरांनी असे पत्र दिले असेल, तर त्यांना बंडखोरीस भाग पाडणाऱ्यांनी ते सार्वजनिक करावे’, असे आव्हान अरविंद सावंत यांनी दिले.
