Mumbai Local Central Railway Special Power Block :ब्लॉकमुळे शनिवारी रात्री उशिरा व रविवारी पहाटे सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी कल्याणला नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना ठाणे स्थानकात थांबा देण्यात येणार आहे
या ब्लॉकमुळे शनिवारी रात्री उशिरा व रविवारी पहाटे सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी कल्याणला नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना ठाणे स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २२१७८ सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेस वांगणी स्थानकावर, तर गाडी क्रमांक ११०२२ तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेस नेरळ स्थानकांवर काही वेळ थांबवण्यात येणार आहे.
ब्लॉक कुठे?
स्थानक : अंबरनाथ ते बदलापूर
मार्ग : अप आणि डाऊन मार्ग
वेळ : शनिवारी मध्यरात्रीनंतर १.३० ते रविवारी पहाटे ४.३०
कर्जत-पनवेल-दिवामार्गे वळवण्यात येणाऱ्या गाड्या
११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क
१८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी
१२७०२ हैदराबाद-सीएसएमटी हुसेनसागर
१११४० होस्पेट-सीएसएमटी
२२१५८ चेन्नई-सीएसएमटी
बाईकला HSRP नंबरप्लेटसाठी ४५० रुपये, नऊ राज्यांत महाराष्ट्रापेक्षा कमी दर? सरनाईक म्हणाले…
उपनगरी रेल्वेवरील परिणाम
शनिवारी रात्री ११.१३ परळ-अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येईल.
शनिवारी रात्री ११.५१ सीएसएमटी-बदलापूर लोकल अंबरनाथमध्ये रद्द करण्यात येईल.
रविवारी मध्यरात्री १२.१२ सीएसएमटी-कर्जत लोकल अंबरनाथमध्ये रद्द करण्यात येईल.
रविवारी मध्यरात्री २.३० कर्जत-सीएसएमटी लोकल अंबरनाथ येथून ३.१० ला रवाना होईल.
रविवारी पहाटे ४.१० कर्जत-सीएसएमटी ही विशेष लोकल म्हणून चालवण्यात येईल.
नागपुरात तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण
दुसरीकडे, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सेलू ते सिंदी दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून, येत्या २७ व २८ मार्च रोजी मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त या मार्गाचे निरीक्षण करून वेग चाचणी घेणार आहेत.
सेलू ते सिंदी हा १८ किमीचा रेल्वे मार्ग आहे. यातील तिसरा आणि चौथा असे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्याने रेल्वे वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, क्षमता सुधारेल आणि प्रवासी तसेच मालगाड्यांच्या हालचाली अधिक सुकर होतील, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. २७ व २८ रोजी होणाऱ्या वेग चाचणीद्वारे नव्या रुळांची सुरक्षितता आणि कार्यक्षमतेची तपासणी केली जाईल, तसेच ते सुरक्षित रेल्वे वाहतुकीचे आवश्यक निकष पूर्ण करतात की नाही, याची खातरजमा केली जाणार आहे.
सर्व रेल्वे कर्मचारी, प्रवासी आणि रेल्वे मार्गाच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांनी चाचणी कालावधीत रेल्वे रूळ ओलांडू नये तसेच सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अतिरिक्त रेल्वे मार्गांच्या पूर्णतेमुळे सध्याच्या रेल्वे मार्गांवरील वाहतूक कमी होईल, विलंब कमी होतील.

