• Mon. Jun 15th, 2026
    Sanjay Raut : कोरटकरचा दुबईमधील फोटो व्हायरल; संजय राऊत म्हणाले, तो वर्षा बंगल्यावरच सापडायचा

    Sanjay Raut on Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरचा दुबईमधील फोटो व्हायरल झाल्याने संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्यांनी भाजप सरकारला मनोरूग्ण म्हटलं आहे आणि गृहखात्याच्या मदतीशिवाय कोरटकर पळून जाऊ शकत नाही, असं म्हटलं आहे. नागपूर दंगलीतील आरोपी पकडले गेले, पण कोरटकर पळून गेला, यावर त्यांनी पोलिसांची जबाबदारी ठरवली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा फोटो व्हायरल झाला आहे. जो पाहून तो दुबईमध्ये असल्याचा दावा केला जाता आहे. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे फायरब्रंँड नेते संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे. उद्या आम्ही कोरटकर पळून गेलो म्हणायचो आणि तो भाजपच्या कार्यालयात, मंत्र्यांच्या बंगल्यात किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा, असं म्हणत राऊतांनी सरकारवर टीका केली आहे.

    प्रशांत कोरटकर हा त्यांचाच नागपूरचा माणूस आहे. आता तो पळून गेला की नाही हे सांगतील. उद्या आम्ही म्हणायचो पळून गेला आणि तो भाजपच्या कार्यालयात, मंत्र्यांच्या बंगल्यात किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा. भाजपच्या राजवटीमध्ये काहीही होऊ शकतं, जर खरोखर कोरटकर पळून गेला असेल तर गृहखात्याच्या मदतीशिवाय तो पलाय व करू शकत नाही. फडणवीसांचे पोलीस इतके सक्षम आहेत, आरोपींना पकडतात सरकारच्या आदेशाने सोडून देतात. कृष्णा आंधळे, कोरटकर सापडत नाहीत म्हणून मी म्हणतो की हे सरकारप मनोरूग्ण असल्याचं संजय राऊत यांनी टीका केली.

    या राज्याची जनता झोळी फिरवून पैसा जमवून या सरकारवर उपचार करू शकते. कोणताही आरोपी पोलिसांच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही. ज्याचा जामीन फेटाळलाय आणि ज्याने महाराजांचा अपमान महाराष्ट्रात केलाय, नागपूर दंगलीतील आरोपी पकडलेत पण याला पकडलं सांगता. पण ज्याला खरोखर पकडायचा होता तो पळून गेला. ज्या दिवशी हाय कोर्टाने जामीन नाकारला तेव्हा तो नागपूरमध्येच होता. नागपूर पोलिसांची ही जबाबदारी आहे. नागपूर पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा बदली केली पाहिजे. खरं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात जबाब दिला पाहिजे. पण आमचे गृहमंत्री ते हवेत पतंग उडवत बसतात. त्यांची पतंग फाटली असून ते कसले पतंग उडवत बसल्याचं म्हणत राऊतांनी घणाघाती टीका केली आहे.

    दरम्यान, दंगल नागपूरलाच का झाली, हा प्रश्न मीच नाहीतर आदित्य ठाकरे आणि इम्तियाज जलील यांनीही विचारला. फडणवीसांचं संपूर्ण सरकार मनोरूग्ण असून त्यांना सामुदायिक मानसोपचार करण्याची गरज आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed